National Farmers Day :राष्ट्रीय शेतकरी दिनाचा इतिहास काय आहे? 23 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? वाचा
National Farmers Day 2024 : जय जवान आणि जय किसान ही देशाची महत्वाची घोषणा.. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला नारा आजही तेवढाच लोकप्रिय आणि आदरभाव व्यक्त करणारा आहे. कारण जवान देशाचे रक्षण करतो तर शेतकरी देशाचे पोट भरतो. अर्थातच शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आज आपण सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने जात आहोत त्याला शेती हे महत्वाचे कारण आहे, शेती देशाला समृद्ध करण्यात मोठी भुमिका निभावते.
या शेतकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणून राष्ट्रीय किसान दिवस म्हणून पाहिला जातो. भारतात दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. हा दिवस शेतकरी दिन म्हणूनही ओळखला जातो. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, ग्रामीण अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आणि देशाचा कृषी वारसा जतन करण्यात शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेची आठवण हा दिवस करून देतो.

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांची जयंती
भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती म्हणून शेतकरी दिन साजरा केला जातो. चौधरी चरणसिंग यांनी देशातील शेतकरी समुदाय आणि शेतकऱ्यांच्या हक्क आणि कल्याणाचा पुरस्कार केला होता. चौधरी चरणसिंग हे शेतकरी नेते होते, म्हणून त्यांच्या जयंतीदिनी शेतकरी दिन साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी झाला.
हेही वाचा : शेतकऱ्यांचे आंदोलन पोहोचले थेट सर्वोच्च न्यायालयात, पहा नेमकं काय घडलंय
किसान दिवसाचा इतिहास
शेतकरी दिन इतिहास भारत सरकारने 2001 मध्ये शेतकरी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या दिवसाचा संदर्भ चौधरी चरणसिंग यांच्या वाढदिवसाशी जोडलेला आहेत. शेतकरी समाजाच्या कल्याणाप्रती त्यांनी केलेल्या समर्पणामुळे, त्यांचा जन्मदिन 23 डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून घोषित करण्यात आला. चौधरी चरण सिंग यांनी 1979 ते 1980 पर्यंत भारताचे 5 वे पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांचे नेतृत्व कृषी सुधारणा, ग्रामीण विकास आणि शेतकरी कल्याणावर केंद्रित होते आणि त्यांची धोरणे आजही भारतातील कृषी प्रगतीचा पाया म्हणून स्मरणात आहेत. भारतीय शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या आजीवन कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले चौधरी चरणसिंग
चौधरी चरणसिंग हे शेतकऱ्यांच्या हक्कांना चालना देण्यासाठी, त्यांच्या उत्पादनाला योग्य आणि न्याय्य भाव मिळवून देण्यासाठी आणि ग्रामीण समुदायांच्या भल्यासाठी लढण्यासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी स्मरणात आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे उद्दिष्ट असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती विधेयकाची अंमलबजावणी हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान होते.ग्रामीण-केंद्रित अर्थव्यवस्था आणि शाश्वत शेतीवर त्यांचा भर आधुनिक कृषी धोरणांवर प्रभाव पाडतो.
हेही वाचा : महिला, शेतकरी आणि ज्येष्ठांनाही केलं खूश; महायुतीचा दिवाळीनंतर सुखद धक्का
किसान दिवसाचे महत्त्व
- शेतकरी दिनाचे महत्त्व भारताची अर्थव्यवस्था, ग्रामीण विकास आणि अन्नसुरक्षा राखण्यात शेतकऱ्यांना मदत करणे, वाजवी किंमत, हवामान बदलांचे अनुकूलन, शाश्वत शेती पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचा हा दिवस आहे.
- शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारी योजना आणि सुधारणांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हे एक व्यासपीठ म्हणूनही काम करते. या दिवशी, लोकांना कृषी क्षेत्रातील वैज्ञानिक आणि तांत्रिक नवकल्पनांची ओळख करून देण्यासाठी देशभरात कार्यक्रम आयोजित केले जातात.
- हे कार्यक्रम शेतकऱ्यांसमोरील आव्हानांवर चर्चा करण्याची आणि त्यांच्या गरजा जाणून घेण्याची संधी देतात.
हेही वाचा : Post Office Scheme : किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला मिळेल मोठा परतावा, अशी करा गुंतवणूक
राष्ट्रीय शेतकरी दिन का साजरा केला जातो?शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांचे योगदान ओळखण्यासाठी शेतकरी दिन साजरा केला जातो. कृषी आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शेतकरी दिन देखील साजरा केला जातो. याशिवाय हा दिवस कृषी नवकल्पनांना चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो.












Click it and Unblock the Notifications