महाराष्ट्रात मतदार यादीतून नावे कशी वगळली? 'माहिती वेबसाइटवर उपलब्ध.. तपासा' ECI चे काँग्रेसला उत्तर
Eci reply to Congress's question : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीतील नावे वगळ्यासोबतच इतर आरोप काँग्रेसने केले होते. दरम्यान, मंगळवारी (24 डिसेंबर 2024) निवडणूक आयोगाने काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की, पक्षाने मागितलेली सर्व माहिती आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील मतदारांशी संबंधित फॉर्म 20 महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, ते डाउनलोड केले जाऊ शकते.

काय होता काँग्रेसचा आरोप
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला होता. काँग्रेसच्या तक्रारीत म्हटले आहे की महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, मतदार यादीतून 80,391 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत, म्हणजेच एका विधानसभा मतदारसंघातून सरासरी 2,779 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत.
हेही वाचा : मतदार यादीत तुमचं नाव आहे की, नाही? मतदान केंद्र सापडत नाही तर कसं शोधायचं, ही आहे सोप्पी पद्धत
काय म्हणाले निवडणूक आयोग
काँग्रेसच्या प्रश्नांवर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांच्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली आहे. त्या मतदारांचा मृत्यू झाला आहे किंवा त्यांचा पत्ता बदलला आहे किंवा ते त्या पत्त्यावर राहणार नाहीत याची खात्री करण्यासाठी नोटीस जारी केल्यानंतर आणि फील्ड सर्व्हे केल्यानंतर त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत, असे आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने दिले काँग्रेसला उत्तर
पारदर्शकता आणि सहभागावर निवडणूक आयोगाने काँग्रेसला उत्तर देताना सांगितले की, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा सक्रिय सहभाग हा प्रमुख आधारस्तंभ मानला जातो. या प्रक्रियेत काँग्रेसच्या प्रतिनिधींचाही सहभाग होता, असे आयोगाने म्हटले आहे. काँग्रेसकडून आलेल्या तक्रारींना उत्तर देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात किंवा असामान्यपणे नावे हटवली गेली नाहीत.
हेही वाचा : विधानसभा निवडणुकीसाठी एकूण किती मतदार? महिला, पुरुष, तृतीयपंथी किती, शंभरी ओलंडलेले इतके मतदार, वाचा
- सरासरी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 2,779 मतदारांची नावे मृत्यू, हस्तांतरण किंवा डुप्लिकेट नोंदीमुळे हटविली गेली आणि हे संपूर्ण प्रक्रियेनुसार केले गेले.
- निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या सक्रिय सहभागाबाबत 60 उदाहरणे दिली आहेत.
- निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख भागधारक असलेले राजकीय पक्ष सुरुवातीपासून मतदानापर्यंत प्रत्येक टप्प्यात सक्रियपणे सहभागी होत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
- भारतीय निवडणूक प्रक्रियेतील राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा अर्थपूर्ण सहभाग हा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
- निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा सहभाग सुनिश्चित केला जातो.
हेही वाचा : EVM व VVPAT मोजणीत तफावत नाही; मविआच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने केला खुलासा












Click it and Unblock the Notifications