Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind Vs Aus 3rd Test WTC final : गाबा टेस्ट ड्राॅ झाल्यास जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये भारत पोहचेल का?

Ind Vs Aus 3rd Test WTC final 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाब्बा येथे सामना अतिशय मनोरंजक टप्प्यात पोहोचला आहे. भारतीय संघाच्या स्टार फलंदाजांनी सुरुवातीला फारशी चांगली कामगिरी केली नाही, पण केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके झळकावून संघाचे आव्हान कायम ठेवले आहे.

या दोघांच्या शानदार खेळीनंतर जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी छोट्या पण महत्त्वाच्या खेळी खेळून सामन्यात चांगलीच रंगत आणली आहे. या दोघांच्या योगदानामुळेच गोलंदाजांनी फॉलोऑन वाचवला आणि फॉलोऑन टाळण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली आणि तसे झाले नसते तर परिस्थिती वेगळी असू शकली असती.

Ind Vs Aus 3rd Test
कसोटी अनिर्णित राहीली तर काय?

आता प्रश्न हा आहे की जर गाब्बा कसोटी अनिर्णित राहिली, तर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत कशी प्रवेश करेल? यासाठी काही महत्त्वाची समीकरणे आणि संभाव्य परिस्थितींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ते कोणते आहेत हे आपण आता पाहुया.

हेही वाचा : भारत-ऑस्ट्रेलिया पर्थ कसोटी; पहिल्या दिवसाच्या डावात काय घडलं, बुमराहने किती घेतले बळी, वाचा सर्वच

टेस्ट ड्राॅ राहिल्यास टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहोचेल?

टीम इंडियाने या मालिकेतील उर्वरित दोन सामने जिंकल्यास ते थेट उपांत्य फेरीत पोहोचेल. त्यांना इतर कोणत्याही संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार नाही. दोन्ही सामने जिंकल्याने संघाची स्थिती मजबूत होईल आणि निश्चित स्थान प्राप्त होईल.

दणदणीत विजय मिळवला तर काय होईल?

जर भारताने एक सामना जिंकला आणि दुसरा हरला तर टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल, पण त्यासाठी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. इतर संघांनी किती सामने जिंकले आणि त्यांचे किती गुण आहेत यावर ही शक्यता अवलंबून असेल.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका अनिर्णित राहिल्यास ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका गमावावी अशी आशा भारताला करावी लागेल. असे झाल्यास भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळू शकते.

हेही वाचा : Australia vs India 2nd Test : भारत-आस्ट्रेलियाची गुलाबी चेंडूसोबत 'गाठ!', कुणाचे पारडे जड? वाचा

भारत 260 धावांवर ऑलआऊट, आकाश दीप 31 धावा करून बाद

तत्पुर्वी भारतीय संघ पहिल्या डावात 260 धावांवर सर्वबाद झाला आहे. आकाश दीप 31 धावा करून बाद झाला. त्याला ट्रॅव्हिस हेडने त्रिफळाचीत केले. बाद होण्यापूर्वी आकाशने बुमराहसह भारताला फॉलोऑनपासून वाचवले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+