Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

shaheed diwas : 23 मार्चला शहीद दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या त्यामागील इतिहास अन् महत्त्व

shaheed diwas 2025 : भारतात 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांचे स्मरण दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी या दिवसाचे खास स्मरण केले जाते.

शहीद दिवसाचा काय आहे इतिहास?

23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगात, युवा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या बलिदानाचा दिवस हा दरवर्षी शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.

साधारणत: 20 वर्षांच्या या शूरविरांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या इतर शूर स्वातंत्र्यसैनिकांनाही आपण या दिवशी विशेष आठवण करून अभिवादन करत असतो.

shaheed diwas 2025

शहीद दिनाचे काय आहे महत्त्व?

भारताच्या स्वातंत्र्यासाठी शौर्याने लढणाऱ्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात शहीद दिनाचे महत्त्व आहे. ब्रिटिश राजवटीपासून मुक्त होण्यासाठी त्यांच्या अथक संघर्षाची आणि बलिदानाची ही एक मार्मिक आठवण आहे. या वीर व्यक्तींनी केलेल्या बलिदानांचा हा दिवस एक श्रद्धांजली अर्पण केली जाते. जो सध्याच्या पिढीला देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी दिवस आहे.

शहीद दिनाचे खूप महत्त्व आहे. कारण तो आपल्याला स्वातंत्र्याचे सार आणि ते सुरक्षित करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेल्या अपार बलिदानांबद्दल प्रकाश टाकतो. आपण कधीही आपल्या स्वातंत्र्याचे मूल्य कमी लेखू नये आणि त्याचे रक्षण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे याची कायमची आठवण करून देतो. हा दिवस देशभक्तीची प्रेरणा म्हणून काम करतो, आपल्या राष्ट्राच्या वृद्धीसाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करतो. हा राष्ट्रीय एकता आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून उभा आहे, देशाच्या स्मृतींना बळकटी देणारा हा दिवस म्हणून याकडे पाहिले जाते.

भगतसिंग-राजगुरु-सुखदेव यांना का दिली फाशी?

इतिहासात जर डोकावून पाहिले तर आपणास भगतिसंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलिदानाची कहाणी समजते. 1928 मध्ये भारतांमधील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून 'सायमन कमिशन' नावाचं शिष्टमंडळ आले होतं. भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.

त्यावेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता. 'सायमन परत जा'च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी आक्रमणात लाला लजपतराय जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. देशभक्तीने भारावलेल्या क्रांतिकारकांना हे सहन झाले नाही.

क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर पोलिस ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही विविध वेश परिधान करून पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे गेले.

सॅंडर्स अधिकारी दिसताच सुखदेव यांनी संकेत दिला. भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळ्या झाडून त्याला ठार केले.

भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उटलं त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+