Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कारगिल विजय दिवस, मोदींनी पाकिस्तानला पुन्हा दिला 'हा' इशारा

Kargil Vijay Diwas : कारगिलमध्ये आम्ही, फक्त युद्ध जिंकलं नव्हतं तर आम्ही सत्य, संयम आणि सामार्थ्याचा अद्भूत परिचय दिला होता, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शहिदांना नमन केलं. कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल येथूनच आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा ही त्यांनी दहशतवाद्यांना दिला आहे.

pm modi

बलिदान देणारे अमरच

पंतप्रधान मोदी म्हणाले, "राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्यांची नावे कायम अमर राहतात. हा देश आमच्या लष्कराच्या पराक्रमी महानायकांचा सदा सर्वदा ऋणी राहिल. हा देश त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. माझं सौभाग्य आहे की, कारगिल युद्धाच्या वेळी मी देशाचा सामान्य नागरिक म्हणून आपल्या सैनिकांच्या मध्ये होतो. मला आठवतंय कशा पद्धतीने आमच्या लष्कराने एवढ्या उंचीवर, एवढं कठीण युद्ध ऑपरेशन लढलं होतं. मी देशाला विजयी करणाऱ्या अशा सर्व शूरवीरांना आदरपूर्वक प्रणाम करतो. मी शहीदांना नमन करतो की ज्यांनी कारगिलमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. कारगिलमध्ये आम्ही, फक्त युद्ध जिंकलं नव्हतं तर आम्ही सत्य, संयम आणि सामार्थ्याचा अद्भूत परिचय दिला होता", असंही मोदींनी स्पष्ट केलं.

जवानांचं अजरामर साहस

मोदींनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला. ते म्हणाले, "भारत कायम शांततेसाठी प्रयत्न करतोय. त्याउलट पाकिस्तानने वारंवार आपला खरा चेहरा दाखवला आहे. कारगिलमध्ये सत्याच्या समोर, असत्य आणि आतंक्यांचा पराभव झाला. पाकिस्तानने जेवढी खोड काढली तेवढ्यावेळी त्यांना चारीमुंड्या चीत व्हावे लागले. पाकिस्तानने कधीही आपल्या इतिहासातून धडा घेतला नाही. आज मी ज्या कारगिलमधून बोलतोय, जिथे दहशतवाद्यांना माझा आवाज थेट ऐकू जात असेल. मी दहशतवाद्यांना सांगू इच्छितो की, त्यांचे नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत."

वाजपेयींनी दाखवली होती निधडी छाती

कारगिल युद्धाच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. भारतीय सैनिकांनी टायगर हिलवर विजय मिळवला. मात्र तरीही पंतप्रधान वाजपेयी थांबायला तयार नव्हते. जोपर्यंत आम्ही प्रत्येक सीमेवरून या पाकिस्तानींना बाहेर काढत नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. भारतीय लष्कराने कारगिल युद्धातील सर्वात महत्त्वाचे शिखर असणारं टायगर हिल 4 जुलैलाच ताब्यात घेतले होतं. पण त्यानंतर वाजपेयींच्या म्हणण्यांनुसार पाकीस्थानच्या सर्व घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी 26 जुलै ही तारीख उजाडली होती. त्यामुळेच टायगर हिल 4 जुलैलाच जिंकले असले तरी कारगिल विजय दिवस हा 26 जुलैला साजरा केला जातो.

टोलोलिंग व टायगर हिल महत्त्वाचे पाँईंट

टोलोलिंग हे NH-1 अल्फापासून अगदी जवळ म्हणजे, अगदी 3 किमी अंतरावर आहे. टायगर हिलच्या बाबतीतही असेच आहे. टायगर हिल हे NH-1 अल्फापासून 8-10 किलोमीटरवर आहे. टायगर हिलवरून NH-1 अल्फा अगदी स्पष्टपणे दिसून येते. ही दोन्ही ठिकाणे अशी आहेत, ती ताब्यात असल्यावर त्या रस्त्यावर दुश्मन कोणतीही हालचाल करू शकत नाही. त्यामुळे भारतीय सैनिकांना ही महत्त्वाची ठिकाणे घुसखोरांकडून ताब्यात घ्यायची होती. त्यातील टायगर हिल हे दहशतवाद्यांकडून 4 जुलैलाच ताब्यात घेतले होते मात्र इतर ठिकाणांवर विजय मिळवायला भारतीय लष्करारा 26 जुलैपर्यंत लढा द्यावा लागला होता.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+