उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे वाढू शकतो मधुमेहाचा धोका; जाणून घ्या डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला!

उन्हाळ्याचा ऋतू आपल्यासोबत कडक ऊन, अंगाची लाहीलाही आणि प्रचंड उष्णता घेऊन येतो. सामान्य माणसासाठी उन्हाळा केवळ थकवा आणि त्रासाचा ठरतो, परंतु मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांसाठी हा काळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि काळजी घेण्याचा असतो.

doctors advice on diabetes summer hydration tips marathi

"वनइंडियाच्या सहकार्याने, सन फार्माने 'इंडिया विन ओव्हर डायबेटिस' (India Win Over Diabetes) ही राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे. याद्वारे लोकांमध्ये मधुमेहाविषयी जागरूकता निर्माण करणे, वेळेत आजाराचे निदान करण्यासाठी स्क्रीनिंगला प्रोत्साहन देणे आणि भारतीयांना त्यांच्या चयापचय आरोग्याची (Metabolic Health) योग्य माहिती देऊन सक्षम करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून या लेखामधून आपण उन्हाळ्यात मधुमेह असलेल्या रुग्णांनी आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे (Hydration) का गरजेचे आहे, हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

मधुमेह आणि शरीरातील पाण्याची कमतरता यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. उन्हाळ्यात जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू लागते. हे नेमके कसे घडते ते पाहूया. आपल्या रक्तात पाण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून गेल्यामुळे रक्त थोडे घट्ट होते. रक्तातील पाणी कमी झाले तरी साखरेचे प्रमाण तेवढेच राहिल्यामुळे, रक्तातील साखरेची टक्केवारी वाढते. सामान्यतः, जेव्हा रक्तातील साखर वाढते, तेव्हा किडनी लघवीवाटे अतिरिक्त साखर शरीराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. परंतु, या कामासाठी किडनीला भरपूर पाण्याची गरज असते. जर रुग्णाच्या शरीरात आधीच पाण्याची कमतरता असेल, तर किडनीला पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी, साखर शरीरातच साचून राहते आणि किडनीवर प्रचंड ताण येतो.

या विषयावर अधिक माहिती देताना, मधुमेहरोग तज्ञ म्हणतात, "उन्हाळ्यात अनेक रुग्ण रक्तातील साखर अचानक वाढल्याची तक्रार घेऊन येतात. याचे मुख्य कारण गोळ्या किंवा औषधांमध्ये झालेला बदल नसून, शरीरातील पाण्याचे कमी झालेले प्रमाण हेच असते. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते, तेव्हा शरीर 'स्ट्रेस मोड'मध्ये जाते. यामुळे शरीरात असे काही हार्मोन्स तयार होतात, जे लिव्हरला अधिक साखर तयार करण्यास भाग पाडतात. म्हणूनच, उन्हाळ्यात मधुमेहाचे नियंत्रण केवळ गोळ्यांवर नाही, तर तुम्ही किती आणि कसे पाणी पिता यावर देखील अवलंबून असते."

उन्हाळ्याच्या वातावरणाचा थेट परिणाम इन्सुलिनच्या कामावरही होतो. जास्त उष्णतेमुळे त्वचेखालील रक्तवाहिन्या मोठ्या होतात. जर एखादा रुग्ण इन्सुलिनचे इंजेक्शन घेत असेल, तर या उष्णतेमुळे इन्सुलिन शरीरात खूप वेगाने शोषले जाऊ शकते, ज्यामुळे अचानक साखर अत्यंत कमी (Hypoglycemia) होण्याचा धोका निर्माण होतो. याउलट, शरीरात पाण्याची तीव्र कमतरता असल्यास इन्सुलिन व्यवस्थित काम करत नाही. उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यास रुग्णाची तब्येत इतकी बिघडू शकते की त्याला थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागू शकते. शरीरात विषारी घटक तयार होणे किंवा साखरेची पातळी कमालीची वाढून रुग्ण बेशुद्ध पडणे, असे धोके यामुळे उद्भवू शकतात. वयस्कर रुग्णांमध्ये हा धोका जास्त असतो.

doctors advice on diabetes summer hydration tips marathi

तसेच, ज्यांना बऱ्याच वर्षांपासून मधुमेह आहे, त्यांच्या शरीराची अंतर्गत तापमान नियंत्रण प्रणाली कमकुवत होते. मधुमेहामुळे घामाच्या ग्रंथी योग्य प्रकारे काम करत नाहीत. परिणामी, मधुमेही रुग्णांना सामान्य लोकांपेक्षा कमी घाम येतो आणि शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही. यामुळे त्यांना उष्माघाताचा म्हणजेच ऊन लागण्याचा धोका जास्त असतो. धक्कादायक बाब म्हणजे, ऊन लागण्याची लक्षणे (चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे) आणि साखर कमी होण्याची लक्षणे सारखीच असल्यामुळे अनेकदा रुग्ण गोंधळात पडतात.

त्रासांपासून वाचण्यासाठी काय प्यावे हे माहीत असणे आवश्यक आहे

शरीरासाठी सर्वोत्तम पेय म्हणजे साधे आणि स्वच्छ पाणी होय. रुग्णांनी दिवसातून किमान तीन ते चार लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय विनासाखरेचे लिंबू पाणी आणि जिरेपूड टाकलेले ताक हे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. दिवसातून एखादे नारळ पाणी घेता येऊ शकते, परंतु बाजारात मिळणारे पॅकेटचे ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स आणि अतिप्रमाणात चहा-कॉफी पिणे पूर्णपणे टाळावे. चहा-कॉफीमुळे शरीरातील पाणी लघवीवाटे जास्त बाहेर पडते आणि डिहायड्रेशन वाढते.

तहान लागण्याची वाट पाहू नये

महत्त्वाची बाब म्हणजे, रुग्णांनी कधीही तहान लागण्याची वाट पाहू नये, कारण मधुमेहामध्ये तहान लागण्याची जाणीव अनेकदा कमी होते. त्यामुळे दर तासाला एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावावी. तसेच, उन्हाळ्यातील आंबे किंवा कलिंगड यांसारखी फळे खाताना डॉक्टरांच्या सल्ल्याने अगदी कमी प्रमाणात खावीत. इन्सुलिन औषध कधीही थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम गाडीत ठेवू नये, कारण उष्णतेमुळे ते खराब होते. उन्हाळ्यात साखरेमध्ये खूप चढ-उतार होत असल्याने घरच्या घरी ग्लुकोमीटरच्या साहाय्याने नियमित साखर तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या देशातील उन्हाळा अत्यंत कडक असतो. अशा परिस्थितीत, योग्य माहिती आणि वेळेवर काळजी घेणे या दोनच गोष्टी आपल्याला मधुमेहावर विजय मिळवून देऊ शकतात. उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे ही केवळ एक गरज नसून, ते मधुमेहाच्या उपचाराचा एक भाग आहे. स्वतःला हायड्रेटेड ठेवा, साखरेवर नियंत्रण ठेवा आणि उन्हाळ्याच्या दिवसांतही सुरक्षित व निरोगी राहा, हाच या मोहिमेचा खरा संदेश आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+