IML 2025 IND vs WI : 50 हजार प्रेक्षकांसमोर मास्टर लीगमध्ये लाराच्या संघाला अंबाती रायडूने केले गार!
India masters vs west indies masters final 2205 Highlights : मास्टर लीगचा भारत आणि वेस्टइंडिय यांच्यातील अंतीम सामन्यानंतर समारोप झाला आहे. सचिन तेंडूलकरच्या भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकत वेस्टइंडियजच्या ब्रायन लाराच्या संघावर मात दिली. यामध्ये खुद्द सचिनने आपल्या तडाखेबंद 25 धावांचे योगदान दिले पण त्याच्यासोबत सलामीला खेळणाऱ्या अंबाती रायडूने सामना एकहाती फिरवला आणि भारताला विजय मिळवून दिला.
या विजयासह भारत आता सर्वच फाॅरमॅटमध्ये जगज्जेता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारताने नुकतीच चॅम्पियन ट्राॅफी जिंकली. त्याआधी भारतीय महिला संघाने आशियायी स्पर्धा जिंकली तर 2024 मध्ये भारतीय पुरुष संघाने टी - 20 जागतिक विश्वकप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आता भारतीय निवृत्त झालेला वरिष्ठ संघही काही कमी नाही हे दाखवून दिले आहे.

International Masters League च्या पहिल्या सत्रात, भारताने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत विजेतेपद पटकावले. सचिन तेंडुलकर इंडिया मास्टर्स संघाचे नेतृत्व करत होता. अंतिम फेरीत अंबाती रायुडूची बॅट चांगली चालली. नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजचा कर्णधार ब्रायन लारा आणि पर्किन्स 6-6 च्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाले. यानंतर ड्वेन स्मिथ थांबला आणि त्याची बॅट सुरूच राहिली. 35 चेंडूत 45 धावा करून तो बाद झाला. तो 41 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. विंडीजची एकूण धावसंख्या 7 बाद 148 अशी झाली. भारताकडून विनय कुमारने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय शाहबाज नदीमनेही 2 विकेट्स घेतल्या.
सचिनची तडाखेबंद फलंदाजी, भारताची झंझावाती सुरुवात
प्रत्युत्तरात खेळताना सचिन तेंडुलकर आणि रायुडू यांनी भारताची झंझावाती सुरुवात केली, दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 67 धावा जोडल्या. 50 हजार प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या रायपूर स्टेडियममधून केवळ सचिनसाठीच घोषणाबाजी करत होते. 2 चौकार आणि 1 षटकार मारल्यानंतर त्याने 18 चेंडूत 25 धावा केल्या, षटकारासाठी चेंडू सीमारेषेपार टोलवताना सचिन झेल देऊन बसला आणि त्याची खेळी तिथेच संपली.
अंबाती रायडूचा इंडिजवर हल्ला
दुसरीकडे, अंबाती रायडू जोरदार बॅटींग करत होता. त्याने एक बाजू चांगलीच सांभाळून ठेवली आणि त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा निघत होत्या. त्याला साथ द्यायला आलेला गुरकीरत मान 14 धावा करून बाद झाला. रायडूने अर्धशतक केल्यानंतरही वेगवान फलंदाजी सुरू ठेवली. 50 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 77 धावा करून तो बाद झाला, पण तोपर्यंत वेस्टइंडिजच्या विजयाचे गणितच त्याने बिघडवून टाकले आणि आपल्या खेळीने भारताच्या विजयाचा पाया रचला विशेषतः वेस्टइंडिज संघाला आपल्या खेळीने त्याने गार करत सामना एकतर्फी केला.
युवराज बिन्नीने केला विजय साकार
रायडूनंतर युवराज 13 आणि बिन्नीने 16 धावा करून नाबाद माघारी परतले आणि 17 चेंडू शिल्लक असताना भारताने विजेतेपद पटकावले. सचिनच्या नेतृत्वाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या संघांचाही यात समावेश होता. प्रत्येक संघाने लीग टप्प्यात 5 कप सामने खेळले, त्यानंतर उपांत्य फेरी आणि एक अंतिम सामना. ही स्पर्धा 22 फेब्रुवारीला सुरू झाली आणि 16 मार्चला संपली. अत्यंत रोमहर्षक असे सामने या स्पर्धेत झाले.












Click it and Unblock the Notifications