आशिया कपमध्ये पुन्हा भारत-पाकिस्तान टस्सल! दोन्ही संघाचे सामने अन् कधी होणार स्पर्धा? जाणून घ्या
Asia Cup 2025 : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर सिंदूर ऑपरेशननंतर भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात प्रचंड तणाव आहे. अशा स्थितीत भारताने पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकार यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही बंदी घातली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांनाही कमालीचा विरोध होत आहे. भारताने पाकिस्तानात न खेळण्याची भुमिका आधीपासूनच घेतली आहे.
यंदा 2025 ची पुरुषांची आशिया कप क्रिकेट स्पर्धा 17 व्यांदा होणार आहेत. त्या सप्टेंबर 2025 मध्ये होणार आहेत. हे सामने टी-20 स्वरूपात खेळवले जातील. या स्पर्धेचा गतविजेता भारतीय संघ आहे.

कोणते संघ ठरले स्पर्धेसाठी पात्र?
या स्पर्धेत 6 संघांचा समावेश असेल. आशियाई क्रिकेट परिषदेचे 5 पूर्ण सदस्य, अफगाणिस्तान , बांगलादेश , भारत , पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आणि 2024 च्या एसीसी पुरुष प्रीमियर कपमध्ये अव्वल स्थान पटकावणारे संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये सामील होतील . स्पर्धेच्या तारखा जुलै 2024 मध्ये जाहीर करण्यात आल्या.
यंदा आशिया कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे अधिकृत आयोजक बीसीसीआय असून सुरुवातीला या स्पर्धा भारतात होणार होत्या, पण भारत-पाकिस्तान संबंधामुळे या स्पर्धा भारत किंवा पाकिस्तान यापैकी कोणत्याही एकाच देशात होतील ही शक्यता नाहीच. मग ही स्पर्धा कधी, कुठे आणि भारत -पाकिस्तान सामने कोणत्या तारखेला होणार हा प्रश्न असंख्य क्रीडा चाहत्यांच्या मनात आहे. आपण आज यासंदर्भात शक्यता आणि माहिती जाणून घेणार आहोत.
तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर इथे वाचा
आशिया कप स्पर्धा कधीपासून सुरु होणार?
टाईम्स ऑफ इंडियाचे वृत्ताचा संदर्भ देत ई-सकाळने आपल्या वृत्तात म्हटले की, आशिया कप स्पर्धा 5 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे.
आशिया कप स्पर्धा कुठे होण्याची शक्यता आहे?
आशिया कप स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे होण्याची दाट शक्यता आहे.
आशिया कप स्पर्धा कोणत्या प्रकारात खेळवली जाणार?
आशिया कप स्पर्धा क्रिकेटच्या टी-20 प्रकारात खेळवली जाणार आहे.
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे किती सामने कधी असू शकतात?
- आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. यामध्ये ७ सप्टेंबरला पहिला सामना होऊ शकतो.
- साखळीसामन्यानंतर सुपर फोर फेरी होईल यामध्ये जर भारत पाकिस्तान संघ पोहचले तर त्यांचा सामना होऊ शकेल.
- त्याशिवाय दोन्ही संघ अंतीम सामन्यात पोहचल्यास आमने-सामने येतील. पाच सप्टेंबरपासून सुरु होणारी स्पर्धा २१ सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications