Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind Vs Pak: सूर्याने आर्मीला समर्पित केला विजय, 'पहलगाम'वरुन असा काही बोलला की पाकचा संघ ऐकत राहिला

Suryakumar Yadav Asia Cup 202 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ एक खेळ नसतो, तर तो एक भावनिक क्षणांचा अनुभव असतो. आशिया कप २०२५ मध्ये दुबई येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने धोबीपछाड केले. पण हा विजय केवळ मैदानापुरता मर्यादित नव्हता. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे या विजयाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.

सूर्याने हा विजय भारतीय लष्कराला समर्पित केला आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्यांविषयी त्यांनी त्याची भावना व्यक्त केली. त्यावेळी तिथे उभा असलेला पाकिस्तानी संघ हे सर्व शांतपणे ऐकत होता.

Asia cup 2025

मैदानावरील यशानंतर भावूक प्रतिक्रिया

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमार यादव सामन्यानंतरच्या सादरीकरणात बोलत होता. प्रेक्षक त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना, सूर्याने या विजयाला त्याच्यासाठी एक "परफेक्ट रिटर्न्स गिफ्ट" म्हटले.

तो म्हणाला की, त्याला शेवटपर्यंत मैदानात राहून संघाला विजय मिळवून द्यायचा होता आणि आज त्याला त्यात यश मिळाले. खेळाच्या बाबतीत तो म्हणाला की, पाकिस्तानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी इतर सामन्यांसारखाच होता आणि ते प्रत्येक संघाविरुद्ध अशीच तयारी करतात.

पहलगाम हल्ल्यावरील स्पष्ट विधान

याच भाषणात सूर्यकुमार यादवने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. एप्रिल महिन्यात, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता, ज्यात 26 लोक मृत्युमुखी पडले होते.

या घटनेवर बोलताना सूर्यकुमार म्हणाला, "थोडा वेळ काढून, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांशी आम्ही आमच्या संवेदना आणि एकता व्यक्त करतो.

सूर्यकुमारचे हे विधान मैदानावर उपस्थित असलेल्या सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते, विशेषतः पाकिस्तान संघासाठी, जे त्याच्यासमोर उभे होते.

विजय भारतीय लष्कराला समर्पित!

सूर्यकुमार यादवने आपला विजय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित न ठेवता तो देशाच्या सुरक्षेशी जोडला. त्याने हा विजय भारतीय लष्कराच्या सर्व सुरक्षा दलांना समर्पित केला, ज्यांनी असीम शौर्य दाखवले आहे.

तो म्हणाला, "आम्ही हा विजय आमच्या सर्व सुरक्षा दलांना समर्पित करू इच्छितो. आशा आहे की ते नेहमीच आम्हाला प्रेरणा देतील आणि आम्ही त्यांना मैदानावर असे काहीतरी देण्याचा प्रयत्न करू जे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकेल.

सूर्यकुमार यादवच्या या कृतीमुळे हा विजय केवळ खेळातील विजय राहिला नाही, तर तो देशाच्या आत्मसन्मानाचा आणि शौर्याचा प्रतीक बनला.

त्याने आपल्या शब्दांनी हे दाखवून दिले की खेळाडू केवळ मैदानावरच नाही, तर देशाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही आपले मत व्यक्त करू शकतात आणि आपल्या विजयाचा उपयोग देशासाठी एक सकारात्मक संदेश देण्यासाठी करू शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+