उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली,राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी उत्तर दिलं
मुंबई: लोकसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप, टीका प्रतिटीकांचा फड चांगलाच रंगलाय.उबाठा विरुद्ध शिवसेना, उबाठा विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध उबाठा अशी धुळवड रंगलेली असतानाच आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा आणखी एक अंक रंगात येतोय.

महायुतीला राज ठाकरे यांनी दिलेल्या "बिनशर्त" पाठींब्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
"बिनशर्त" नव्हे "बिनशर्ट पाठींबा" उद्धव
शिवसेना स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. "उद्धव ठाकरे नको, म्हणून काहीजणांनी "बिनशर्ट" पाठींबा होता, बिनशर्ट म्हणजे उघड पाठींबा", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली होती. उद्धव यांच्या या टोल्याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात झाली.
मनसेकडून देखील चोख प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच समाचार घेतला होता. "हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्यामुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार नाही" असे प्रत्युत्तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिले होते. सामान्य कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची सोशल मिडीयावर चांगलीच रेवडी उडवली होती.
"राज"पुत्र अमित ठाकरे मैदानात
उबाठा आणि मनसेत असे धुमशान सुरु असताना राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी त्यात उडी घेतलीय. "वरळीत मागच्या विधानसभेतच्या वेळेस राजसाहेबांनी जेंव्हा 'बिनशर्त' पाठींबा दिला होता, त्यामुळे ज्यांचा मुलगा आमदार म्हणून निवडून आला, त्यांनीच असले विनोद करावेत याचं आश्चर्य वाटतं... कोणी कोणासाठी काय केलं आहे हे विसरलं नाही पाहिजे. राहिला विधानसभा निवडणुकीचा प्रश्न.. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत शक्ति दाखवेल हे नक्की." असा इशारा अमित यांनी दिलाय.
आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना अवघ्या ६ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. त्यातच अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात आपला वावर वाढवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाले होते राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 9 रोजी एप्रिलला शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्याला संबोधित केलं होतं. या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले होते की, "महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी...परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे असं मी जाहीर करतो".
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications