मोदी, शहांचा मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव - उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबईला अदानी सिटी करण्याच डाव आहे. ते धारावी अदानींच्या घशात घालत असून ते नागरी संतूलन बिघडवत आहे असा आरोप करत मुंबईला लुटायचे कारस्थान आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
जागा अधिगृहीत करण्याचा कट
उद्धव ठाकरे म्हणाले की, अदानींना वारेमाफ एफएसआय दिला जात आहे. धारावीचा प्रकल्प अदानींना देत सरकार त्यांच्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जागा अधिगृहीत करुन त्यांना देत आहे हा प्रकार काय आहे. पात्र-अपात्रेतेचा कट करीत धारावीची जागा मिळवायचा सरकारचा कट आहे. हा प्रकार त्यांच्या मित्रासाठी आहे.

अदानींचे टेंडर रद्द करा
उद्धव ठाकरे म्हणाले, धारावीच्या झोपडपट्टीधारकांना पात्र-अपात्र कशाच्या आधारावर ठरवत आहात असा सवाल करीत सरकार फसवणूक करीत आहे. हे टेंडर रद्द होऊ शकते. अदानीसाठी मुंबईची विल्हेवाट लावणार असाल तर ते टेंडर रद्द करा. अदानींनीही हे टेंडर सोडून द्यावे पुन्हा टेंडर काढा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
मुंबई घशात घालण्याचा डाव
उद्धव ठाकरे म्हणाले, अदानीच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे, तो शिवसेना उधळून लावल्याशिवाय राहणार आहे. एकूणच नागरी सुविधांवर भार पडणार तो उचलणार कोण, त्याचे पैसे कोण देणार, पिण्याचे पाणी त्याचा खर्च हे सर्व अदानी देणार आहेत का. त्यांना जर हे झेपत नसेल तर टेंडर रद्द करा. धारावीकरांना उद्धवस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही.
धारावीकरांना आमचे वचन
उद्धव ठाकरे म्हणाले, धारावीची शाळा, रुग्णालय कुठे होणार, कोळीवाड्याचे काय करणार याचा कुठेच उल्लेख नाही. टेंडर नियमबाह्य नाही पण आताच्या सोईसुविधा नियमबाह्य आहे. भविष्यात आमचे सरकार आले तर आमचे धारावीकरांना वचन आहे की, तुम्ही जिथे आहात तिथेच हक्काचे घर देऊ. तिथेच रोजीरोटीचा विचार करु
मुंबईचे नागरी संतूलन बिघडेल
उद्धव ठाकरे म्हणाले, धारावीकरांना हाकलून द्यायचे आणि मुंबईचे नागरी संतूलन बिघडवायचे हे कारस्थान आहे. टोलनाक्याची जागाही अदानींना देणार मग हा प्रकल्प किती वर्ष चालणार, या लोकांनी कसे राहायचे तोपर्यंत अदानी हे या लोकांच्या रोजीरोटीचा विचार करणार आहेत का. हे टेंडर का रद्द करु नये याचे उत्तर या सरकारने द्यायला हवे असेही ठाकरे म्हणाले.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications