Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'अबू आझमीला कोल्हापुरी चपलेने फोडून काढावं लागेल'; ठाकरे गट अन् मनसे नेते अबू आझमीवर का संतापले?

Abu Azmi Latest Marathi News : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी वारी संदर्भात वादग्रस्त विधान केले. त्यानंतर महाराष्ट्रात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अबू आझमी यांची फार लाज काढली. तर अबू आझमी यांना कोल्हापुरी चपलेचा इंगा दाखवावा लागतो, असा निशाणा ठाकरेंच्या शिलेदाराने केला. त्यात मनसे कशी मागे राहणार, मनसे नेत्याने तर अबू आझमी यांना थेट कानशिलात लगावण्याचा इशारा दिला.

ठाकरे गटाच्या नेत्यांनी अबू आझमींना काय दिला इशारा!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी अबू आझमींना थेट इशारा दिला आहे. "अबू आझमी यांनी जर राजकीय विषयावर बोललं असतं, तर ते खपून घेतलं असतं. पण त्यांनी पांडुरंगाच्या वारीवर केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही, अबू आझमी तुम्ही पांडुरंगाच्या वारी वर बोलला आहात, हे खपवून घेतले जाणार नाही. अबू आझमी ज्या पद्धतीने बोलले आहेत, त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या कातड्याची चप्पल आणून त्यांचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही, असा थेट इशारा कोळी यांनी दिला.

Abu Azmi

अबू आझमी जिथे असतील तिथे त्यांना चपलेचा हार घालू?

शरद कोळी पुढे बोलताना म्हणाले की, अबू आझमींच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाज बांधवांच्या आणि हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्याला शिवसैनिक कधीच माफ करणार नाहीत. ते ज्या ठिकाणी दिसतील, त्या ठिकाणी त्यांना चपलांचा हार घालण्यात येईल. कोल्हापूरच्या चपलेने त्यांचे तोंड फोडले जाईल.

अबू आझमींना पुन्हा एकदा कानाखाली द्यावी लागेल!

अबू आझमींना पडलेली कानाखाली विसरले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला कानाखाली द्यावी लागेल. त्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही, असे म्हणत अबू आझमींच्या वारी संदर्भातील वक्तव्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?

अबू आझमी यांनी म्हटले होते की, आजपर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात? याची तक्रार केली नाही. पण, ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु.

मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं की, लवकर जाऊ अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिमांच्या बाबतीत हे करत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केले.

अबू आझमींच्या वक्तव्याविरोधात आंदोलन

अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सोलापुरातील वारकरी रस्त्यावर उतरत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अबू आझमी यांच्या 'वारीमुळे रस्ता जाम होतो' या वक्तव्याच्या विरोधात वारकऱ्यांनी टाळ वाजवत निषेध आंदोलन केले आहे. सोलापुरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. अबू आझामी यांनी त्यांचे विधान मागे घेतले नाही तर राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वारकऱ्यांनी दिला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+