विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप झाला तर आम्हीच करणार - रावसाहेब दानवेंचे वक्तव्य
मुंबई - विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्ष आमच्यासोबत आहेत. या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही. पण राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करणार", असे सूचक विधान रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जात आहेत.
विरोधक राजकीय भूकंप करु शकत नाही
रावसाहेब दानवे म्हणाले, "विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार तर नाहीच पण यांच्याकडून (विरोधकांकडून) राजकीय भूकंप होऊ शकत नाही. जर राजकीय भूकंप झालाच तर तो आम्ही करणार असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

आरक्षणाचा प्रश्न एकत्रित सोडवावा
रावसाहेब दानवे म्हणाले, महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. यावरही समाजाचे समाधान झालं नसेल तर यावर काय मार्ग निघू शकतो? यासाठी महायुती सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यात सर्वांनी एकत्र येऊन ते प्रश्न सोडवले पाहिजेत. पण दोन दिवसांपूर्वी जी बैठक पार पडली, त्या बैठकीला विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. याचा अर्थ त्यांना हे आरक्षण देण्यासंदर्भात आस्था नाही.
मराठा आरक्षणावरून विरोधकांवर टीका
रावसाहेब दानवे म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा विषय होऊ नये. सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र बसून यावर मार्ग काढावा. हे आमचे मत आहे. राज्यात भाजपचे सरकार असताना आरक्षण दिले गेले. मात्र, त्या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात आरक्षणाला स्थगिती मिळू दिली नाही. त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाला.
पुढे आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला. पण त्यावेळी राज्यात जे कोणी सत्तेत होतं, त्यांनी आरक्षणासाठी वकिलांची फौज आणि त्यासाठी लागणारी माहिती दिली नाही. त्यामुळे ते आरक्षण रद्द झाले अशी विरोधकांवर रावसाहेब दानवे यांनी टीका केली.
आमदारांना ठेवले हाॅटेलमध्ये
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीलाही मतं फुटण्याची भिती वाटत आहे. महायुतीसह महाविकास आघाडीने आपल्या सर्व आमदारांना फाईव्हस्टार हॉटेलमध्ये ठेवले आहे.
याबरोबरच पसंतीक्रमानुसार मतदान कसे करायचे? याचे मार्गदर्शनही त्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी ९ ते ४ या वेळेत विधानभवन परिसरात मतदान होणार आहे. त्यानंतर पाच वाजता मतमोजणी होणार आहे.
-
भारताला तेल खरेदी करण्यासाठी कोणाच्याही 'परवानगी'ची गरज नाही, विषय संपला ! -
Box Office Report : 'द केरळ स्टोरी 2' ची जादू कायम; नवीन चित्रपटांची संथ सुरुवात, 'ओ रोमियो'ची घसरण -
आहार 2026: एक अनिवार्य व्यापार प्रदर्शन -
IND vs NZ Final: भारत रचणार इतिहास! फायनलमध्ये 'या' 2 स्टार खेळाडूंचा पत्ता कट होणार? कारण काय, वाचा -
महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! जिष्णू देव वर्मा यांच्याकडे राज्याची धुरा; वाचा त्यांच्याबद्दल -
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! 'एवढ्या' लाखांचे कर्ज माफ होणार! काय स्वस्त काय महाग यादी पहा -
Women's Day 2026: केवळ मेसेज नको, द्या 'हे' खास सरप्राईज! महिला दिनासाठी स्वस्त 5 हटके गिफ्ट आयडियाज -
डोनाल्ड ट्रम्पंबाबत 3 भविष्यवाण्या! 2 ठरल्या खऱ्या; आता तिसरं धडकी भरवणारं भाकित, VIDEO व्हायरल -
IND vs NZ Final: हेड-टू-हेडमध्ये टीम इंडिया 'किंग', पण वर्ल्ड कपमध्ये किवींचेच पारडे जड; आकडेवारी? -
परवानगीची गरज नाही!; रशियन तेल खरेदीबाबत भारताचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर; म्हणाले-राष्ट्रहित प्रथम -
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित CM फडणवीसांकडून नव्या योजनांचा पाऊस; वाचा घोषणांची यादी -
इराण-अमेरिका युद्धाचा फटका!'या' कारणामुळे पुण्यातील व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा बंद! आले आदेश









Click it and Unblock the Notifications