कोर्टाने लोकभावनेचा आदर करायला हवा होता, महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई : बदलापूरमधील शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने आज राज्यभरात बंदचे आवाहन केले होते पण हा बंद बेकायदेशीऱ असल्याचे हायकोर्टाने सांगितल्यानंतर बंद मागे घेण्यात आला. पण आज राज्यभरात ठिकठिकाणी 'निषेध आंदोलन' केली जात आहेत. यावर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी "न्यायदेवताही एक स्त्री आहे, कोर्टाने लोक भावनेचा आदर करायला हवा होता" अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात सध्या सुरू असलेला निषेध हा लोकभावनेचा उद्रेक आहे, हा साधा विषय नाही. खऱ्या अर्थाने न्यायालयाने जनभावनेचा आदर करायला हवा होता. ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत ते बघता इथे कोणीही सुरक्षित नाही. कोर्टालासुद्धा मुलीबाळी आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोर्टसुद्धा एक माणूसच असून न्यायदेवता एक स्त्री आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे.

सध्या घडीला न्यायदेवतेवर देखील अत्याचार होत आहेत. त्यासाठीच आमची लढा होती. मात्र कोर्टाने अशा प्रकारच्या निर्णय का दिला हे कळले नाही आम्ही त्यांच्या निर्णयाचा सन्मानच करतो. पण शिवसेनेच्या निकालाबाबत ज्याप्रमाणे तारखांवर तारखा वाढत दिल्या जात आहेत हा देखील एक प्रकारे राज्यघटनेवरचा बलात्कारच आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, निर्णय कोणाच्या दबावाखाली दिला असं आम्ही म्हणणार नाही, पण आम्हाला राज्यातील महिला, युवती आणि कायद्याची काळजी आहे. म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीमध्ये आंदोलनाला फार महत्त्व आहे. मात्र आमचा आवाज दाबत असेल तर लोकशाहीला फार महत्त्व उरणार नाही.
कोर्टालाही लेकी-बाळी,सुना आहेत
बदलापूरची घटना हे अमानवी कृत्य असून त्याच्या निषेधार्थ आज बंद पुकारला होता. जनतेचा आक्रोश देशभरात पोहोचवण्यासाठीचा आजचा बंद होता. तो कुठलाही राजकीय बंद नव्हता. किंबहुना आजचा बंद हा शंभर टक्के यशस्वी होणार होता. ज्यामुळे सरकारला अडचण झाली असती. काही दिवसांपूर्वी देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली होती. देशभरात त्याचे पडसाद उमटले. मात्र त्यावेळी कोणीही कोर्टात गेले नाही.
मात्र महाराष्ट्र बंदची हाक देताच सरकारने एका सदा लाडक्या याचिकाकर्त्याला कोर्टात पाठवलं आणि त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. मात्र दुर्दैवाने यापुढे जर अशी घटना घडली तर त्यासाठी न्यायालय आणि त्या संबंधित याचिकाकर्ते जबाबदार राहतील. कोर्टाचा सन्मान राखून जरी बंद मागे घेतला असला तरी आज राज्यभरात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून रस्त्यावर उतरू. असेही संजय राऊत म्हणाले.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा








Click it and Unblock the Notifications