मिलिंद देवरांच्या प्रचार कार्यालयाचे मुख्यमंत्री शिंदेंनी केले उद्घाटन; ठाकरे गटावर साधला निशाणा
वरळी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या वरळीमधील निवडणूक प्रचार कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच मुंबई-कोस्टल रोड, आरे कारशेड, मेट्रो 3, अटल सेतू, महालक्ष्मी रेसकोर्समधील पार्क अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये टाकलेले स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले, असा दावा केला. जर आम्ही ब्रेक काढले नसते तर 15 वर्ष हे प्रकल्प पूर्ण झाले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मिलिंद देवरा यांनी यापूर्वी दोनवेळा लोकसभेत वरळीकरांचे प्रतिनिधीत्व केले होते. गेल्या वर्षात वरळीकरांना जो न्याय मिळायला हवा होता तो दुर्देवाने मिळाला नाही. त्यामुळे खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली. देवरा मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतील, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यासोबतच मुंबईतील रेस कोर्सच्या जागेवर सर्वात मोठे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात ओपन स्पेस मिळणार आहे. येथील कोळीवाड्यांचा विकास, तिथे तयार केलेले फूड प्लाझा, रस्त्यावर केलेले सुशोभीकरण असेल, डीप क्लिन ड्राईव्ह यांसारखे उपक्रम या… pic.twitter.com/uyNEnDPYhL
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 4, 2024
वरळीतील स्पॅन वायडनिंगचा प्रश्न सोडवण्यास आधीच्या सरकारने असमर्थता दाखवली होती. मात्र मुख्यमंत्री झाल्याबरोबर हा प्रश्न तातडीने सोडवला, असे शिंदे म्हणाले. प्रेम नगर, सिद्धार्थ नगर, बी.डी.डी चाळ, पोलीस वसाहती वरळी कोळीवाडामधील रखडलेले प्रकल्प, धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्याचे काम सरकारने केले. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी ७ एजन्सी एकत्रपणे काम करत आहेत. रमाबाई नगरमधील १७ हजार भाडेकरुंना घरे देणार आहोत. मुंबईबाहेर फेकलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आपले सरकार करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
लाडकी बहीण योजनेचा लाभ अडीच कोटी महिला भगिनींना मिळाला आहे. मात्र संधी मिळाली तर ही योजनाच बंद करण्याची घोषणा काही मंडळींनी केलेली आहे. त्यामुळे या योजनेला विरोध करणाऱ्यांना नक्की जाब विचारा असे आवाहन स्थानिक नागरिकांना केले. तसेच कायम घरात राहून नव्हे तर लोकांमध्ये मिसळून काम… https://t.co/vxVDFFcRIk pic.twitter.com/lEFUbAOdpl
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 4, 2024
निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही एकच टेप रेकॉर्ड काहीजण लावतात. मात्र आता ही रेकॉर्ड चालणार नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर, फिनटेक कॅपिटल आणि पॉवरहाऊस बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आहे. डबल इंजिनचे सरकार म्हणजे डबल गॅरंटी असे ते म्हणाले. पाच मिनिटे तुमची तर पाच वर्षे आमची हा आमचा शब्द आहे. काम करणाऱ्या लोकांना मत द्यायचे असून घरी बसणाऱ्यांना कायमचे घरी बसवायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांना केले.












Click it and Unblock the Notifications