Manoj Jarange's hunger strike : मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषणास्त्र! सरकारला 29 सप्टेंबरपर्यंत वेळ
Manoj Jarange's hunger strike :मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं आहे. येत्या 29 सप्टेंबरपासून ते आपल्या गावी अतंरवाली सराटी इथं आमरण उपोषण करणार आहेत. हे त्यांनी आज अंतरवाली सराटी इथं जाहीर केलं.
मनोज जरांगे यांनी ्मागील काही दिवसांपुर्वी आपलं आमरण उपोषण थांबवलं होतं. जर सलाईन लावून उपोषण करायचंच असेल तर अशा उपोषणाचा उपयोग नाही असं म्हणत त्यांनी आपलं उपोषण थांबवलं होतं परंतु आता पुन्हा मनोज जरांगे यांनी आरक्षणाचं हत्यार उपसलं आहे.

123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची बैठक
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनी गतवर्षी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने जरांगे यांनी गोदापट्ट्यातील 123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची आज आंतरवाली इथं बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे म्हणाले की,जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे (Manoj Jarange's hunger strike)उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावही जरांगे यांनी यावेळी टीका केली. दरम्यान, जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या या निर्णयाला उपस्थित समाजबांधवांनी विरोध करत उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती यावेळी केली.
सरकारला वठणीवर आणू
मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं की, आपण थांबून चालणार नाही आरक्षणाचा लढा तीव्र करावा लागणार आहे. राज्यातील सरकारला वठणीवर आणायची गरज असुून सरकार निवडणुकांना घाबरत नाही आणि रस्त्यावरच्या आंदोलनालाही भीत नाही.
सरकारला 29 सप्टेंबरपर्यंत वेळ
मनोज जरांगे म्हणाले, आपण सरकारला 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देऊ. तोपर्यंत सरकारने आरक्षण दिले तर ठीक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज येथे आंतरवाली सराटीत येऊन उपोषणाला बसेल, असे मनोज जरांगे म्हणाले.
113 आमदार पाडू
मनोज जरांगे म्हणाले, आता सरकार दिलेल्या मुदतीत काय करते हे पाहू. आपण निवडणुकीतही पाडू. त्यांचे 113 आमदार पाडू म्हणजे पाडूच. आपल्या जातीचे कल्याण केल्याशिवाय आता आपल्याला शांत बसायचे नाही. आता ही आरपारची लढाई आहे. जे होईल ते होईल.
फडणवीसांना धडा शिकवू
मनोज जरांगे म्हणाले, महाराष्ट्रात येत्या एक महिन्यात मी दौरा करणार आहे. सर्वच जिल्हे व तालुके पिंजून काढण्यात येईल. देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाबद्दल कळवळा नाही, त्यामुळे त्यांना आपल्याला या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे असाही इशारा त्यांनी दिला.(Manoj Jarange's hunger strike)
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications