Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यात आज मुसळधार पाऊस, 19 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढली आहे. मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली असून, हवामान विभागाने आज, 20 जुलै रोजीही राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Maharashtra rain alert

राज्याची राजधानी मुंबई आणि तिच्या उपनगरांमध्ये आकाश मुख्यतः ढगाळलेले राहील; मात्र, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी, म्हणजेच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या निवडक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागांसह कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांनाही हवामान विभागाने 'यलो अलर्ट' दिला आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यातही पावसाची शक्यता असून, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील स्थिती अधिक गंभीर असून, नागपूर आणि अमरावतीसह सर्व ११ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी पुढील २४ तास सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+