लवकरच कर्जमाफीची घोषणा होणार? महायुती सरकारमधील मंत्र्यांनी दिले संकेत
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील, असे संकेत महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू
पुसद येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, "संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात सध्या चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच यासंदर्भात निर्णय घेऊन कर्जमाफीची घोषणा करतील." वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राज्यातील १३ प्रयोगशील शेतकऱ्यांचा 'कृषी गौरव पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला.
राज्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी 'सात-बारा कोरा करा' अशी मागणी लावून धरली आहे. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनीही यासाठी आंदोलन केले होते. त्यामुळे, सरकारवर वाढलेला दबाव लक्षात घेता कर्जमाफीचा निर्णय लवकर होण्याची शक्यता आहे.
कृषिमंत्र्यांचेही सूतोवाच
यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गरज असल्याचे मान्य केले होते. "मी शेतकरीपुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहित आहेत," असे ते म्हणाले होते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून यावर योग्य वेळी निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
सध्याच्या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही जोर धरत आहे. या सर्व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्री संजय राठोड यांनी दिलेले संकेत महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications