शेतक-यांसाठी महत्वाची बातमी, पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची 15 जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. याबाबत स्वत : मुंडे यांनी आपल्या एक्स सोशल मिडीयावर पोस्ट करुन माहीती दिली आहे.

सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची सामूहिक सुविधा (CSC) केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता. याबाबत मंत्री मुंडे स्वतः पाठपुरावा करत होते.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत आपल्या पिकाचा विमा भरण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. उर्वरित पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी आपला पीकविमा 31 जुलै पर्यंत भरून घ्यावा..
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 15, 2024
केंद्रीय कृषिमंत्री… pic.twitter.com/dtxfkqumiw
त्यानुसार आता एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. याबद्दल कृषी मंत्री मुंडे यांनी एक्स या सोशल मिडीयावरुन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. दरम्यान या पीक विमा याजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री मुंडे यांनी केले आहे.












Click it and Unblock the Notifications