Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काही लोक दिल्लीत जातात गल्लीत फिरतात मला मुख्यमंत्री करा म्हणतात- एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray for becoming CM : "काही लोक दिल्लीत जातात गल्लीत फिरतात मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा म्हणून सांगतात; पण हा एकनाथ शिंदे दिल्लीत जातो ते फक्त महाराष्ट्राला निधी मिळावा म्हणून, महाराष्ट्रासाठी प्रकल्प मिळावे, महाराष्ट्राच्या योजनांना पैसा मिळावा आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना मंजूर व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करतो." असे म्हणत शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली.

साक्री मतदार संघाच्या शिवसेनेच्या उमेदवार मंजुळाताई गावित यांच्या प्रचारार्थ दहिवेल येथे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा संपन्न झाली. यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, उमेदवार मंजुळा गावित आदींची उपस्थिती होती.

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray for becoming CM

हे सरकार शेतकऱ्यांचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, लाडक्या बहिणींचे लाडक्या भावांचे आणि सर्वसामान्य जनतेचे आहे. या सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि जेष्ठ नागरिकांसह महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. सोयाबीनला भाव मिळत नाही हे लक्षात येताच मी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारची मदत घेतली आहे.

कापूस सोयाबीनला भाव देणार

सोयाबीनला प्रतिक्विंटल 4892 रुपये आधारभूत किंमत देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. 15% मॉइश्चर असलेला सोयाबीन देखील खरेदी केला जाणार आहे. सोयाबीन पेंट ला देखील निर्यातीला परवानगी देणार, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. तसेच मिडीयम त्रिपल कापसाला 7 हजार 121 आणि लाँग ट्रिपल कापसाला 7 हजार 520 रुपये भावाने नाफेड खरेदी करणार असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता शिंदे यांनी टीका केली. काही लोक दिल्लीत जातात गल्लीत फिरतात मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा म्हणून सांगतात पण हा एकनाथ शिंदे दिल्लीत जातो ते फक्त महाराष्ट्राला निधी मिळावा म्हणून, महाराष्ट्रासाठी प्रकल्प मिळावे, महाराष्ट्राच्या योजनांना पैसा मिळावा आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या योजना मंजूर व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करतो.

मोदी आणि मनमोहनसिंग यांच्यात केली तुलना

केंद्रात असलेल्या पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारने दहा वर्षात फक्त दोन लाख कोटी रुपये एवढा निधी दिला. तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राला दहा लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे. काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या घोषणा फक्त आपल्या योजनांची कॉपी आहे.

अरे सरकार काय बंद करण्यासाठी आहे का?

एकनाथ शिंदे म्हणाले, आपण सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी हे विरोधक न्यायालयात गेले. आताही ते आम्ही सरकारमध्ये आलो तर या योजना बंद करू, योजना सुरू करणाऱ्यांना तुरुंगात घालू असे म्हणत आहेत. अरे सरकार काय बंद करण्यासाठी आणि स्टे लावण्यासाठी असते का? सरकारने जनतेसाठी योजना सुरू करायला हव्या, कामे करायला हवी, प्रकल्प सुरू करायला हवे, ते न करता फक्त हे बंद करू आणि ते बंद करून स्टे लाऊ, एवढेच बोलत आहेत. त्यामुळे जनता यांना नक्कीच स्टे लावेल व महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार निवडून आणेल, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+