Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जर पर्याय नसेल, तर आम्हाला उठाव करावाच लागेल : मनोज जरांगे पाटील

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा आज झाला. या मेळाव्यात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.

"कोणावर अन्याय होऊ नये, म्हणून मराठा समाजाने तलवारी हाती घेतल्या आहेत. आमचे रक्त सांडले, आमचे माणसे मारली गेली, पण आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला नाही," असे भावनिक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. त्यांनी पुढे म्हटले की, "कोणीही आले तरी झुकायचे नाही, परंतु अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करणे आवश्यक आहे."

Manoj Jarange Patil

आज विजयादशमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगड येथे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 300 एकरात हा भव्य मेळावा पार पडला. राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या अन्यायाविरोधातील लढ्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. "अन्यायाविरोधात उठाव करावाच लागतो. आमच्या समाजावर केवळ अन्याय येत आला आहे, आणि आता तो सहन करणे शक्य नाही. आम्ही गरिबांवर किंवा श्रीमंतांवर कधीच अन्याय केला नाही, आम्ही सर्वांसाठी झीज केली आहे," असे त्यांनी सांगितले.

मेळाव्यादरम्यान, जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपस्थित असलेले मराठा बांधव "एक मराठा, लाख मराठा" अशा घोषणा देत होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. नारायणगड ते व्यासपीठापर्यंत मनोज जरांगे पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते.

जरांगे पाटील नेमके काय म्हणाले...

जरांगे पाटील यांनी आपले विचार मांडताना समाजावरील अन्यायाबद्दल संताप व्यक्त केला. "हा समाज जातीवाद करत नाही, आणि कधीच मस्तीत वागत नाही. आम्हाला न्यायाच्या मार्गाने सुखाकडे जायचे आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. "जर पर्याय नसेल, तर आम्हाला उठाव करावाच लागेल," असे ठामपणे त्यांनी सांगितले.

नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी जरांगे पाटील यांच्या संकल्पाचे समर्थन करत, "जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विश्वरूप दाखवले आहे," असे म्हटले. विजयादशमीच्या दिवशी त्यांनी समाजाचा निर्धार आणि एकजूट दाखवत यासाठी हा मेळावा बोलावल्याचेही महंतांनी सांगितले.

तगडा पोलिस बंदोबस्त

मेळाव्यासाठी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्यभरातून आलेल्या हजारो मराठा बांधवांनी नारायणगडावर एकत्र येत आपली एकता दाखवली. हा दसरा मेळावा मराठा समाजाच्या हक्कांच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+