जर पर्याय नसेल, तर आम्हाला उठाव करावाच लागेल : मनोज जरांगे पाटील
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा आज झाला. या मेळाव्यात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.
"कोणावर अन्याय होऊ नये, म्हणून मराठा समाजाने तलवारी हाती घेतल्या आहेत. आमचे रक्त सांडले, आमचे माणसे मारली गेली, पण आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला नाही," असे भावनिक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. त्यांनी पुढे म्हटले की, "कोणीही आले तरी झुकायचे नाही, परंतु अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करणे आवश्यक आहे."

आज विजयादशमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगड येथे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 300 एकरात हा भव्य मेळावा पार पडला. राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या अन्यायाविरोधातील लढ्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. "अन्यायाविरोधात उठाव करावाच लागतो. आमच्या समाजावर केवळ अन्याय येत आला आहे, आणि आता तो सहन करणे शक्य नाही. आम्ही गरिबांवर किंवा श्रीमंतांवर कधीच अन्याय केला नाही, आम्ही सर्वांसाठी झीज केली आहे," असे त्यांनी सांगितले.
मेळाव्यादरम्यान, जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपस्थित असलेले मराठा बांधव "एक मराठा, लाख मराठा" अशा घोषणा देत होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. नारायणगड ते व्यासपीठापर्यंत मनोज जरांगे पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते.
जरांगे पाटील नेमके काय म्हणाले...
जरांगे पाटील यांनी आपले विचार मांडताना समाजावरील अन्यायाबद्दल संताप व्यक्त केला. "हा समाज जातीवाद करत नाही, आणि कधीच मस्तीत वागत नाही. आम्हाला न्यायाच्या मार्गाने सुखाकडे जायचे आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. "जर पर्याय नसेल, तर आम्हाला उठाव करावाच लागेल," असे ठामपणे त्यांनी सांगितले.
नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी जरांगे पाटील यांच्या संकल्पाचे समर्थन करत, "जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विश्वरूप दाखवले आहे," असे म्हटले. विजयादशमीच्या दिवशी त्यांनी समाजाचा निर्धार आणि एकजूट दाखवत यासाठी हा मेळावा बोलावल्याचेही महंतांनी सांगितले.
तगडा पोलिस बंदोबस्त
मेळाव्यासाठी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्यभरातून आलेल्या हजारो मराठा बांधवांनी नारायणगडावर एकत्र येत आपली एकता दाखवली. हा दसरा मेळावा मराठा समाजाच्या हक्कांच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
-
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय! अदानी फाऊंडेशन भारतातील 10 लाख महिलांना देणार उद्योजकतेचे बळ -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार! -
'धुरंधर-2' साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; रणवीर सिंहच्या स्पाय-ॲक्शन थ्रिलरचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! -
Maharashtra weather update: एकीकडे महाराष्ट्र तापला! दुसरीकडे 'या' ठिकाणी पावसाचा इशारा -
शिवम दुबे-अंजुम खानची 'हटके' लव्हस्टोरी; धर्माची भिंत ओलांडली! शिवमपेक्षा पत्नी वयाने 'एवढी' मोठी -
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने मोडला पवन कल्याणचा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी बाॅलीवूडला हादरवणारी 'एवढी' कमाई








Click it and Unblock the Notifications