..ही 2 मुस्लिम स्थळे वगळता मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना!..शिंदे सरकारवर ओवेसींची कडाडून टीका
मुंबई - महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना आणली असून आता या योजनेनेचे एकीकडे स्वागत होत असतानाच टीकाही होत आहे. एमआयएम पक्षाचे प्रमुख असुदोद्दीन ओवीसी यांनी या योजनेवरुन एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे.
निवडणुका पाहून योजना..
ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात निवडणुका होऊ शकतात. याच पार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे सरकार राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोकांना आकर्षित करण्यासाठी या योजना असल्याचे विरोधक मानत असून त्यांच्याकडून अशा धडाधड आणलेल्या योजनेसंदर्भात टीका केली जात आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
निवडणुकीच्यो तोंडावर राज्य सरकार योजना आणत असल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, "सरकार विविध कल्याणकारी योजना सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यापैकी एक मध्यप्रदेशसारखी लाडकी बहना योजना आहे, मी त्याचे स्वागत करतो. पण राज्य सरकारने कुटुंबातील बहिणींसाठी योजना आणली. भावांनी काय केले. त्यांच्यासाठीही अशी योजना आणायला हवी.
राज्य सरकार घरात भांडणे लावत असल्याची टीकाही त्यांनी केली होती. तसेच निवडणुका तोंडावर आल्यानंतर अशा योजना आणल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले ओवेसी?
असुदोद्दीन ओवीसी यांनी महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रासंदर्भात आणलेल्या योजनेवर टीका केली. महाराष्ट्र सरकारने 60 वर्षांवरील लोकांना मोफत तीर्थयात्रा देणारी "मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना" आणली आहे. 2 मुस्लिम स्थळे वगळता, काही गुरुद्वारा आणि चर्च ही हिंदू तीर्थक्षेत्रे आहेत. हे तुष्टीकरण नाही का? ही "रेवडी" नाही का? जे श्रद्धावान आहेत ते ही तीर्थयात्रा स्वतः करू शकतात.
The Maharashtra govt has come up with a “CM Pilgrimage Scheme”offering free pilgrimage for people above 60 years. Except for 2 Muslim sites, a few Gurudwaras & Churches the overwhelming majority of sites are Hindu pilgrimage sites. Is this not appeasement? Is this not “revdi”?…
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 16, 2024
काय आहे योजना?
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेत महाराष्ट्र सरकार साठ वर्षांवरील नागरिकांना तीर्थयात्रा घडवणार आहे. याअंतर्गत पात्र व्यक्तीच्या राहण्याचा, प्रवासाचा आणि भोजनाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. या योजनेचा शासन निर्णय अर्थात जीआर 14 जुलैला काढण्यात आला आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस











Click it and Unblock the Notifications