शपथ घेताच श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी संसद केली विसर्जित, जाणून घ्या का घेणार संसदीय निवडणूक?
Sri Lanka News: श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी मंगळवारी रात्री उशिरा संसद विसर्जित केली आणि 14 नोव्हेंबर रोजी संसदीय निवडणुक होणार असल्याची घोषणा केली. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी निवडणूक प्रचारादरम्यानच आश्वासन दिले होते की, ते जिंकल्यास 45 दिवसांत देशात संसदीय निवडणुका होतील.
निवडणूक जिंकल्यानंतर संसदेवर राष्ट्रपतींचे नियंत्रण अधिक मजबूत करणे हा या मागचा उद्देश आहे, जेणेकरून त्यांनी कठोर निर्णय घेतल्यास संसदेत त्या निर्णयाला विरोध होऊ नये आणि कोणतेही विधेयक संसदेकडून सहज मंजूर होऊ शकेल.

दिसानायके यांनी संसद का विसर्जित केली?
असोसिएटेड प्रेस सरकारी सूचनेचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी मध्यरात्री संसद विसर्जित केली. 225 सदस्यांच्या संसदेत दिसानायके यांच्या पक्षाकडे सध्या फक्त तीन जागा आहेत, त्यामुळे लवकर निवडणुकांमुळे त्यांना संसदेत बहुमत मिळू शकते आणि त्यांना सध्या निवडणुकीत उतरायचे आहे कारण त्यांची लोकप्रियता कायम आहे आणि त्यांना त्याचा फायदा घ्यायचा आहे.
यापूर्वी मंगळवारी दिसानायके यांनी हरिणी अमरसूर्या यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आणि 24 वर्षात श्रीलंकेच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. 54 वर्षीय हरिणी या युनिव्हर्सिटी प्रोफेसर राहिलेल्या आहेत, त्या दिसानायके यांच्या मार्क्सवादी नॅशनल पीपल्स पॉवर अलायन्सशी संबंधित आहेत.
त्यांची नियुक्ती माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांच्यावर दिसानायके यांच्या निर्णायक विजयानंतर करण्यात आली आहे, जी मागील प्रशासनाने गंभीर आर्थिक संकट हाताळण्याच्या पद्धतीबद्दल सार्वजनिक असंतोष दर्शविते.
अमरसूर्या, ज्यांनी न्याय, आरोग्य, महिला, व्यापार आणि उद्योग यासह इतर चार मंत्रालयांच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत, त्यांना विजिता हेरथ यांचे समर्थन मिळेल, ज्यांना परराष्ट्र व्यवहार, वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षा या सहा खात्यांचे देखरेख सोपणविण्यात आली आहे.
डिसानायके यांनी IMF बेलआउट करारानुसार पूर्ववर्ती राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या अंतर्गत लादलेले कठोर कर आणि इतर कठोर आर्थिक उपाय कमी करण्याचे वचन दिले आहे. त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात देशातील कर आणि महागाई कमी करणे हा मोठा मुद्दा बनवला होता आणि त्याचा त्यांना खूप फायदा झाला. पण, कर आणि महागाई कमी करणे सोपे होणार नाही आणि ते कर दरात कपात करून आयएमएफच्या अटींचे उल्लंघन करतील का? हा प्रश्न आहे
जर राष्ट्रपती दिसानायके यांनी IMF च्या अटींचे उल्लंघन केले तर त्याचा 3 अब्ज डॉलरच्या बेलआउट पॅकेजवर खोल परिणाम होऊ शकतो आणि IMF बेलआउट पॅकेज थांबवू शकतो, ज्यामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा कोलमडून पडेल. आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जनतेला मोठी आश्वासने देणे राष्ट्रपती दिसानायके यांना महागात पडू शकते आणि जर ते आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले तर त्यांना जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागू शकते.
पाकिस्तानच्या बाबतीत आपण पाहिले आहे की इम्रान खानच्या सरकारच्या काळात जेव्हा आयएमएफच्या अटींचे उल्लंघन झाले होते, तेव्हा त्याला मिळणारे हप्ते कसे बंद केले गेले आणि त्यानंतर पुढचा हप्ता घेण्यासाठी पाकिस्तानला आयएमएफकडे डझनभर वेळा नाक घासावे लागले. भारत, जपान आणि चीनच्या हमींवर श्रीलंकेला IMF बेलआउट पॅकेज मिळाले आहे आणि IMF बेलआउट पॅकेज करारातून बाहेर पडणे या द्विप राष्ट्रासाठी महागात पडू शकते.












Click it and Unblock the Notifications