आव्हानांना आव्हान देणे, माझ्या डीएनएमध्ये : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रशियात संबोधन
मॉस्को - भारताच्या विकासाने आज जग थक्क झाले आहे. आमच्याकडे जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप प्रणाली असून गरीबी ते हवामान बदलापर्यंत आव्हान देण्यास भारत सर्वात पुढे आहे.आव्हानांना आव्हान देणे माझ्या डीएनएमध्ये आहे. तिसऱ्या टर्ममध्ये मी तिप्पट ताकदीने काम करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी मॉस्कोमध्ये भारतीयांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी माझ्यासोबत भारताच्या मातीचा सुगंध आणला आहे. मी तुमच्यासाठी 140 कोटी देशवासियांचे प्रेम आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे.

भारत आणि रशियाचे अनोखे नाते
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आणि रशियाचे अनोखे नाते आहे. रशियाचे नाव ऐकताच भारतीयांच्या मनात येतो, आपला सुख-दु:खाचा साथीदार आहे. मागच्या दहा वर्षात देशातील विकास पाहून जग हैराण झाले आहे. भारतात परदेशी नागरीक येतात तेव्हा भारत बदलतोय हे ते म्हणत आहे. भारताचे नवनिर्माण त्यांना पाहायला मिळत आहे. भारताने जी- 20 चे यशस्वी आयोजन केले. हे पाहून जगातील लोक भारत बदलत असल्याचे सांगत आहेत.
सरकारच्या उद्दीष्टांत 3 या अंकाचा प्रभाव
पंतप्रधान म्हणाले, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही सरकारच्या काही उद्दीष्टांत तीन या अंकाचा प्रभाव आहे. तिसऱ्या टर्ममध्ये भारताला जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती बनवणे , गरीबांना तीन कोटी घरं बनवणे, तीन कोटी लखपती दिदी बनवणे हे आमच्या सरकारचे उद्दीष्ट आहे.
मातृभुमी भारताबद्दल अभिमान
पंतप्रधान म्हणाले- भारत बदलत आहे कारण 140 कोटी भारतीय लोक भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प करीत आहे.भारतीय नागरीक देशाला विकसीत बनवण्यासाठी मेहनत घेत आहे. जगात जे भारतीय राहतात, ते भारताचा विकास पाहून आपल्या मातृभुमी भारताबद्दल अभिमान बाळगत आहात.
विदेशी मित्रांसोबत चर्चेवेळी भारताच्या विकासाचा पाढा वाचतात आणि हे विदेशी मित्र भारताचा विकास पाहून अचंबित होतात. हे 140 कोटी देशवासीयांनी करुन दाखवले.
भारत आर्थिक महासत्तेच्या दिशेने
पंतप्रधान म्हणाले- आम्ही आपल्या अर्थव्यवस्थेला कोविड संकटातून सुखरुप बाहेर काढले फक्त हेच नाही केले तर जगातील महत्वाच्या आर्थिक महाशक्तीच्या पंक्तित आणून ठेवले. देशाच्या प्रत्येक गरीबांना मोफत उपचार देत आहोत. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा योजना आणली आहे.
हार न मानणाऱ्यांचा विजय
पंतप्रधान मोदी म्हणाले -जो हार मानत नाही त्याचाच विजय होतो. भारताची युवाशक्ती भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी सामर्थ्यशील आहे.मागच्या दहा वर्षातील विकास फक्त ट्रेलर आहे. येत्या काळात आणखी विकास होणार आहे. सेमी कंडक्टर, इलेक्ट्रीक व्हेईकल, ग्रीन हायड्रोजन, वर्ल्डक्लास इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत विकासावर आम्ही भर देत आहोत.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications