Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जेलमध्ये बंद असलेल्या इम्रान खान यांनी भारताला दिली धमकी; शरीफ कुटुंबाला म्हटले- तुम्ही भित्रे आहात

Imran Khan attack on Modi government over Pahalgam Attack : पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पहलगाम हल्ल्यावर विधान करत भारत सरकारला धमकी दिली आहे. तर दुसरीकडे त्यांनी त्यांच्या देशातील शरीफ सरकारचे देखील वाभाडे काढले, शरीफ सरकार भित्रे, घाबरट सरकार आहे, असाही आरोप त्यांनी केला.

काय म्हणाले इम्रान खान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी पहलगाम दहशतवादी हल्ला 'अत्यंत दुःखद आणि वेदनादायी' असल्याचे म्हटले. पाकिस्तानवर बोट दाखविण्याऐवजी भारताने जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला.

त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांचे विधान जारी करण्यात आले आहे. निवेदनात इम्रान खान म्हणाले की, भारताने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. "पहलगाम घटनेतील जीवितहानी अत्यंत अस्वस्थ करणारी आणि दुःखद आहे. मी पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.

Imran Khan on Modi government

पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा तोच डाव!

इम्रान खान पुढे म्हणाले की, 'जेव्हा पुलवामा घटना घडली, तेव्हा आम्ही भारताला सर्वतोपरी मदत केली, परंतु भारत कोणतेही ठोस पुरावे देऊ शकला नाही. 2019 मध्ये भाकीत केल्याप्रमाणे, पहलगाम हल्ल्यानंतर देखील भारत सरकार पुन्हा तेच करू पाहत आहे. मोदी सरकार आत्मपरीक्षण आणि चौकशी करण्याऐवजी सरकार पुन्हा तसाच काहीसा डाव आखत आहे, पुन्हा पुन्हा पाकिस्तानला दोषी ठरवत आहे.

'पाकिस्तानात प्रत्युत्तर देण्याची पूर्ण ताकद'

इम्रान खान म्हणाले की, माझ्या सरकारने २०१९ मध्ये संपूर्ण देशाला इशारा दिला होता. पाकिस्तानकडे कोणत्याही भारतीय हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देण्याची पूर्ण क्षमता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांद्वारे आपल्याला देण्यात आलेल्या काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचे महत्त्व नेहमीच अधोरेखित केले गेले आहे.

हे ही वाचा : मोदींनी सैन्याला फ्री हॅंड दिला, पाकिस्तान भेदरला; मंत्री तरारांची मध्यरात्री PC, म्हणाले-आम्ही सज्ज

आरएसएसवर काय साधला निशाणा

इम्राम खान म्हणाले की, भारतातील सरकार हे आरएसएस विचारसरणीच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. परंतु, ते केवळ भारत किंवा राज्यासाठीच नाही तर ते संपूर्ण जगाला अडचणीचे ठरू शकते.

शांतता ही आमची प्राथमिकता

इम्रान खान यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले की, शांतता ही आमची प्राथमिकता आहे, परंतु त्याला तुम्ही भित्रेपणा ठरवू नये. भारताच्या कोणत्याही धाडसाला योग्य उत्तर देण्याची पूर्ण क्षमता पाकिस्तानकडे आहे.

हे ही वाचा : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा, मास्टरमाइंड हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्याचा माजी पॅरा कमांडो

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+