Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताला अणुहल्ल्याची धमकी देताना शंभर वेळा विचार करेल पाकिस्तान, हल्ला झाल्यास "ब्रह्मास्त्राने"....

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे परस्पर संबंध गेल्या 75 वर्षांपासून तणावाचे राहिलेले आहेत. पाकिस्तानने चार वेळा भारताकडून हार पत्करली असून थेट मैदानात भिडणे अशक्य झाल्यामुळे दहशतवाद्यांच्या माध्यमातून आपला हेतू साध्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो. आता तर दोन्ही देश अणुअस्त्र सज्ज असून पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि स्थानिक नेते भारताला वारंवार अणुबॉम्बची धमकी देत असतात. मात्र आता भारताच्या हाती ब्रम्हास्त्र सापडले आहे. ते इतके परिणामकारक आहे की भारताला धमकी देताना सुद्धा पाकिस्तान 100 वेळा विचार करणार आहे.

स्वदेशी तंत्रज्ञान आणि तीव्र इच्छाशक्तीने तयार करण्यात आलेल्या हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या शस्त्रसाठ्यात एक महत्त्वपूर्ण साखळी जोडली गेली आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या अभियांत्रिकी कौशल्यावर शिक्कामोर्तब झाले असे नाही तर हायपर सोनिक सक्षम देशांच्या समूहात भारताचा समावेश सुलभ झाला आहे,

पुराणकाळात भारताकडे ब्रह्मास्त्र होते. अत्यंत विनाशकारी अशी या शस्त्राची ओळख होती मात्र आज हायपर सोनिक क्षेपणास्त्रे तयार करण्यात आली आहेत जी आधुनिक शास्त्राच्या आधारे बनवलेली असून शक्तीचे प्रतीक मानली जातात. प्रत्यक्ष युद्ध मैदानात त्यांची परिणामकारकता खूपच आहे. जाणून घेऊया ही क्षेपणास्त्रे इतकी घातक का आहेत आणि आपल्या विरोधी देशांमध्ये खळबळ का निर्माण झाली आहे?

indias hypersonic missile test

द बेस्ट हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र

वेगाच्या रथावर स्वार भारतीय तंत्रज्ञान: हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र आकाशात चित्त्याच्या चपळाईने वेग घेते. मेक पाच पेक्षा त्याचा वेग अधिक आहे. मेक पाच चा वेग आवाजाच्या वेगाच्या पाचपट अधिक असतो. अत्याधुनिक तंत्रज्ञान या क्षेपणास्त्राचे नियंत्रण करते. हे क्षेपणास्त्र बर्फाळ प्रदेशातील बिबट्याप्रमाणे हळूच तसेच प्रसंगी अत्यंत वेगवान पद्धतीने आपला वेग कमी जास्त करू शकते. शत्रू राष्ट्राचे तळ समूळ नष्ट करून टाकण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे

अजोड संरक्षण

अंदाज येणे अशक्य: या क्षेपणास्त्रात अत्यंत अत्याधुनिक असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्याचा अंदाज लावणे निव्वळ अशक्य असते. हे क्षेपणास्त्र प्रचंड वेगाने आपली दिशा बदलते. सध्या प्रचलित असलेल्या प्रणालीत या क्षेपणास्त्राचा माग काढणे केवळ अशक्य आहे.

अत्यंत कमी उंचीवरून उड्डाण करण्याची क्षमता: हायपरसोनिक क्षेपणास्त्र जमिनीच्या पातळीपासून अत्यंत कमी उंचीवर उड्डाण घेऊ शकते त्यामुळे रडार मधून निघणारी किरणे त्याचा तपास करू शकत नाहीत.

थर्मल क्लॉक : हायपरसोनिक गतीमुळे निर्माण झालेली उष्णता खूप अधिक असते मात्र या क्षेपणास्त्राचा वेध घेण्याची क्षमता असलेले किंवा त्याचा तपास करू शकणारे अन्य क्षेपणास्त्र सध्या कुणाकडे उपलब्ध नाही.

सध्याचे एअर डिफेन्स प्रणाली अपयशी का ठरते?

हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर केला जातो. अत्यंत कमी गतीने उड्डाण करणारा ड्रोन असो किंवा आकाशातून वेध घेणारी पारंपरिक बॅलेस्टिकचे क्षेपणास्त्रे. पण हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रे या सर्वांपासून वेगळी आहेत.

शत्रूच्या विरोधात भारताचा धोरणात्मक डाव

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध 75 वर्षांपासून तणावाचे आहेत. पाकिस्तानच्या अण्वस्त्र सज्जतेला हायपरसोनिक क्रूज विमान हे तोडीस तोड उत्तर आहे. पाकिस्तान आता भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देताना शंभर वेळा विचार करणार आहे कारण भारताच्या प्रत्युत्तर दाखल होणाऱ्या कारवाईत पाकिस्तानचे अस्तित्वच नष्ट होऊ शकते. पाकिस्तानचे सैन्य तळ, शास्त्रास्त्र भंडारे क्षणार्धात नष्ट होऊ शकतात. भारताकडे आता असा जबरदस्त पर्याय प्राप्त झाला आहे. आपल्या पूर्वेकडील शेजारी असलेला चीन आणि भारत यांच्यातील संबंध देखील तणावाचेच आहेत. चीनकडे या आधीपासूनच हायपरसोनिक क्षेपणास्त्रे उपलब्ध आहेत त्यामुळे आतापर्यंत चीनने भारतावर आघाडी घेतली होती मात्र आता भारतही हायपर सोनीक सज्ज असून चीनच्या नजरेला नजर भिडवण्याची क्षमता भारताकडे निर्माण झाली आहे

भारताची लष्करी स्वायत्तता

लष्करी आणि संरक्षणात्मक स्वायत्तता हा भारताच्या अभिमानाचा विषय आहे. साम्राज्यवादी शक्तींचा बिमोड करून भारत एक स्वतंत्र राष्ट्र बनले या परंपरेचा भारताला अभिमान आहे. भारताच्या एकूणच भूमिकेला सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रे आणखी झळाळी देतात. कारगिलचे युद्ध हे अलीकडच्या काळात झालेले सर्वात मोठे युद्ध होते. त्यावेळी भारत आयात केलेल्या शस्त्रास्त्रावर अवलंबून होता मात्र आता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रास्त्रे बनविली जात आहेत आणि भारत विदेशी शस्त्रावर अवलंबून नाही

भारताच्या संरक्षण सज्जतेतील नवे युग

सुपरसोनिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ही छोटी गोष्ट नाही. संरक्षण सज्जतेत भारताने नवा मोठा टप्पा गाठला आहे. ही यशस्वी चाचणी एका नव्या युगाचे प्रतीक आहे तिथे भारतीय सैन्यदले अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आणि सक्षम आहेत. सकाळच्या प्रहरी भारतातील मंदिरांतून घंटानाद होत असतो त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रातही सुपरसोनिक सज्जता हा घंटानादच आहे. आम्ही सुसज्ज आहोत आणि आम्ही एक पाऊल पुढे आहोत असा संदेश या यशस्वी चाचणीने जगाला दिला आहे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+