Bangladesh violence:बांगलादेशात राज्यघटनेसह, राष्ट्रगीत बदलण्याची मागणी, भारतावर केला 'हा' मोठा आरोप
Bangladesh violence : सध्या बांगलादेशात राष्ट्रगीत बदलण्याची मागणी होत आहे. देशातील एका माजी सैनिकाने असे म्हटले होते की, देशाचे राष्ट्रगीत "अमर सोनार बांगला" 1971 साली भारताने आपल्यावर लादले होते आणि देशाचे राष्ट्रगीतातून वसाहतवादी भूतकाळ आमच्या समोर मांडला आहे आणते. बांगलादेशातील कट्टरपंथी राष्ट्रगीत बदलण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, देशाच्या अंतरिम सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की देशाचे राष्ट्रगीत बदलण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही.
राष्ट्रगीत बदलण्याची मागणी का करण्यात आली?
बांगलादेश जमात-ए-इस्लामीचे माजी अमीर गुलाम आझम यांचा मुलगा अब्दुल्लाहिल अमान आझमी यांनी या आठवड्यात राष्ट्रगीतावर भाष्य केले. भारतावर आरोप करत त्यांनी राष्ट्रगीत आणि संविधान बदलण्याची मागणी केली होती.
अब्दुल्लाहिल अमान आझमी म्हणाले, राष्ट्रगीताचा विषय मी या सरकारवर सोडतो. देशाचे सध्याचे राष्ट्रगीत हे आपल्या स्वतंत्र बांगलादेशच्या विरुद्ध आहे. हे राष्ट्रगीत बांगलादेशची फाळणी आणि दोन बंगालच्या एकत्रीकरणाचा काळ दर्शवते. ते पुढे म्हणाले की, असे कसे होऊ शकते की जे दोन बंगाल एकत्र करण्यासाठी बनवले गेले ते गाणे स्वतंत्र बांगलादेशचे राष्ट्रगीत होऊ शकते.
भारतावर आरोप
अब्दुल्लाहील अमान आझमी भारतावर आरोप करत म्हणाले, भारताने हे राष्ट्रगीत 1971 साली आमच्यावर लादले. ते म्हणाले, अनेक गीते देशाचे राष्ट्रगीत होऊ शकतात. देशाच्या अंतरिम सरकारने देशासाठी नवीन राष्ट्रगीत निवडण्यासाठी एक आयोग स्थापन करावा.
राज्यघटनेत बदल करण्याचीही मागणी
माजी ब्रिगेडियर जनरल यांनीही राष्ट्रगीत बदलण्याची मागणी केली होती. शेख हसीनाचे सरकार उलथून टाकल्यानंतर माजी ब्रिगेडियर जनरलची सुटका करण्यात आली. नुकतेच त्यांनी नवीन राष्ट्रगीत निर्मितीचे समर्थन केले. देशाच्या अस्मिता आणि मूल्यांशी अधिक चांगले जुळणारे इस्लामिक तत्त्वांसह राष्ट्रगीत तयार झाले पाहिजे, असे सांगून त्यांनी राज्यघटनेतील बदलांकडेही लक्ष वेधले.
सरकारने नकार दिला
देशाच्या अंतरिम सरकारने राष्ट्रगीतामध्ये बदल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बांगलादेशचे राष्ट्रगीत बदलण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, असे देशाचे धार्मिक व्यवहार सल्लागार एएफएम खालिद हुसैन यांनी शनिवारी सांगितले. बांगलादेशला भारतासोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत, असेही ते म्हणाले.

देशातील मंदिरांवरील हल्ल्यांबाबत हुसेन म्हणाले की, धार्मिक स्थळांवर हल्ले करणारे मानवतेचे शत्रू आहेत. ते लोक गुन्हेगार आहेत आणि त्यांना शिक्षा होईल. लवकरच दुर्गापूजा साजरी केली जाईल, त्यासंदर्भात ते म्हणाले, देशातील दुर्गापूजेच्या वेळी मदरशातील विद्यार्थी मंदिरांचे रक्षण करतील जेणेकरून दुर्गापूजेदरम्यान मंदिरांवर हल्ले होणार नाहीत.(Bangladesh violence )












Click it and Unblock the Notifications