बांगलादेशात हिंसाचार! जवळपास 1 हजार भारतीय विद्यार्थी परतले मायदेशी...
सध्या बांगलादेशातील सरकारी नोकरी मधील आरक्षणाच्या विरोधातील संतापामुळे केल्या जाणाऱ्या निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. आरक्षणाच्या विरोधातील संतापामुळे बांगलादेशात विविध भागात हिंसाचार उसळल्याचे चित्र दिसून येत आहे.
आतापर्यंत या हिंसाचारामध्ये 105 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये शेकडो नागरिक जखमी झाले आहेत तर आंदोलन आणि हिंसाचारात सातत्याने वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण झाला आहे.त्याच पार्श्वभूमीवर देशात अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. देशभरामध्ये लष्करांची तैनात करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या ठिकाणी राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी काही सूचना स्पष्ट केले आहेत.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय बांगलादेशची राजधानी ढाका येथील भारतीय उच्च आयुक्तालय आणि चितगाव, राजशाही, सिल्हेत आणि खुलना येथील सहाय्यक उच्चायुक्त कार्यालयाने भारतीय कार्यरत असल्याचे सांगितले आहे.
विद्यार्थी मायदेशी परतले..
प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसारआज 20 जुलै रोजी बांगलादेशातील विविध भू बंदरावरून 778 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले तर 200 विद्यार्थ्यांना ढाका आणि चितगाव येथील विमानतळाहून भारतात आणण्यात आला आहे. अशा एकूण जवळपास 1000 भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
मदतीसाठी 24 तास आपत्कालीन नंबर बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये उरलेल्या 4000 हून अधिक विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात येत असल्याचे एमइए निवेदनात सांगितले आहे. भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी 24 तास सुरू राहणारे आपत्कालीन नंबरही सुरू केले आहेत.
आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे डाका आणि चितगाव येथून भारताला अखंडित उड्डाण सेवा सुनिश्चित करण्यासाठी आयोग बांगलादेशच्या नागरिक उड्डाण प्राधिकरणाने व्यावसायिक विमान कंपन्यांशी समन्वय साधत असल्याची माहिती देखील मिळत आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications