"भाजपच्या इशाऱ्यावर तुम्ही जे काही करता ना..!" केजरीवाल यांचे निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर
Yamuna water poison : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील भाजप सरकार यमुनेच्या पाण्यात विष मिसळत असल्याचा दावा केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना नोटीस पाठवून पाच प्रश्न विचारले असून शुक्रवारी 11 वाजेपर्यंत उत्तर मागितले होते. शुक्रवारी केजरीवाल यांनी यमुनेचे पाणी विषारी असल्याच्या विधानाला उत्तर देण्यासाठी नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचून आपले उत्तर पत्र सादर केले.
नोटीसीला उत्तर देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही केजरीवाल यांच्यासोबत पोहोचले.

केजरीवाल यांनी पत्रात लिहिले - भाजपच्या इशाऱ्यावर तुमचा माझ्यावर आरोप...
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात केजरीवाल यांनी लिहिले आहे की, "दिल्लीतील लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा हीच माझी चिंता आहे. आणि मी यासाठी लढत आलो आहे आणि यापुढेही भाजपच्या इशाऱ्यावर तुम्हाला जी शिक्षा द्यावी लागेल त्याचे मी स्वागत करतो. हे षडयंत्र आहे: केजरीवाल यांनी दावा केला की, 'आप'ची प्रतिमा खराब करण्यासाठी अर्ध्या दिल्लीला पाणी दूषित करण्याचा हा डाव आहे.
आमचा संघर्ष कामी आला
यमुनेच्या पाण्यात अमोनियाचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी झाल्याचे केजरीवाल म्हणाले. 26 जानेवारीला ते 7 पीपीएम होते आणि आता ते 20.1 पीपीएमवर आले आहे.
आम्ही आवाज उठवला नसता तर....
अरविंद केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयोगाने मला नोटीस पाठवून धमकी दिली आहे, निवडणूक आयोगाला माझे उत्तर आहे की आम्ही आवाज उठवला नसता आणि संघर्ष केला नसता तर आज अर्ध्या दिल्लीत जलसंकट उद्भवले असते. आम्ही अर्ध्या दिल्लीला जलसंकटातून वाचवला असा दावा त्यांनी केला.
निवडणूक आयोगाने आधीच माझ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय
मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, या नोटीसची भाषा माझ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेत आहे. आवाज उठवल्याबद्दल 'आप'ला टार्गेट करून निवडणूक आयोग "संदेशवाहकाला गोळी मारत आहे".












Click it and Unblock the Notifications