Uttarakhand Earthquake उत्तरकाशीमध्ये 24 तासांत चार वेळा भूकंप, लोकांमध्ये भीतीचे वातावरण
Uttarakhand Earthquake news: उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये गेल्या दोन दिवसांत चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज म्हणजेच शनिवारी पहाटे 5:48 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यानंतर पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी एक दिवस आधी उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते.
या भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांच्या मनात 1991 च्या विनाशकारी भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.6 होती. 1991 मध्ये उत्तरकाशी येथे झालेल्या विनाशकारी भूकंपात मोठे नुकसान झालं होतं. भूकंपाच्या दृष्टीने उत्तरकाशी हा जिल्हा अतिशय संवेदनशील आहे. ते भूकंप झोन पाचमध्ये येते. येथे अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

शुक्रवारी सकाळी उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयात मनेरी, भटवाडी आणि दुंडा या भागात भूकंपाचे तीन धक्के जाणवल्याने लोक घाबरले आहेत. भूकंपाचा पहिला धक्का 7:41 वाजता, दुसरा 8:19 वाजता आणि तिसरा 10:59 वाजता जाणवला. पहिल्या दोन भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 2.7 आणि 3.5 होती; ज्याचा केंद्रबिंदू देखील उत्तरकाशी जिल्ह्यात स्थित आहे.
तर तिसरा भूकंप खूपच सौम्य होता आणि त्यामुळे त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर नोंदवता आली नाही. पण लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले आणि ते घराबाहेर पडले. शुक्रवारी झालेल्या भूकंपाच्या तीन धक्क्यांमध्ये, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वरुणावत पर्वतावर सक्रिय झालेल्या भूस्खलन क्षेत्रातूनही दगड पडले. सुरक्षेच्या कारणास्तव, आपत्ती व्यवस्थापन विभागाने एसडीआरएफ टीम घटनास्थळी पाठवली. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाने भूस्खलन झाल्याचे नाकारले आहे.
दरम्यान, भूकंपाचा पहिला धक्का सकाळी 7:41 वाजता आला, ज्याचा केंद्रबिंदू तहसील भटवाडीतील तिलोथ गावाच्या जंगलात, जमिनीपासून 5 किमी खाली होता. दुसरा भूकंप सुमारे अर्ध्या तासानंतर सकाळी 8:19 वाजता जाणवला, ज्याचा केंद्रबिंदू देखील तहसील भटवाडीमधील दयारा बुग्यालच्या जंगलात जमिनीपासून 5 किमी खाली होता. हा धक्का इतका जोरदार होता की लोक घाबरून घराबाहेर पडले. यानंतर, अडीच तासांनंतर सकाळी 10:59 वाजता तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला.












Click it and Unblock the Notifications