आप नाही, हे तर 'आप'त्ती सरकार; वाचा, मोदींनी केजरीवालांवर नेमका काय साधला निशाणा
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होईल. मतदानापूर्वी सर्वच पक्ष मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यात व्यस्त आहेत. त्याचवेळी आर के पुरम येथे पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक रॅलीला संबोधित करताना बसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

दुहेरी इंजिनवर विश्वास
निवडणूक रॅलीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, दिल्लीतील आप पार्टीने येथे 11 वर्षे वाया घालवली. मी दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाला विनंती करतो की कृपया आम्हाला राज्यात तुमची सेवा करण्याची संधी द्या. मी खात्री देतो की मी तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. पीएम मोदी पुढे म्हणाले की, आपल्याला असे दुहेरी इंजिन सरकार बनवायचे आहे जे लढण्याऐवजी दिल्लीच्या जनतेची सेवा करेल. मोदीजी पुढे म्हणाले की, तुम्ही येत्या ५ वर्षांसाठी केंद्रात भाजपचे सरकार स्थापन केले आहे. आता दिल्ली उद्ध्वस्त होऊ द्यायची नसेल तर, चुकूनही दिल्लीची सत्ता या आप-त्ती सरकारला देऊ नका. दिल्लीतल्या झाडूचे पेंढे कसे विखुरले गेले आहेत, हे आपण सध्या पाहत आहात.
नेहरु-गांधींवरही टिका
यावेळी पंतप्रधान मोदींनी नेहरू आणि इंदिरा गांधींवरही हल्लाबोल केला. पीएम मोदी म्हणाले की, जर तुम्ही नेहरूजींच्या काळात 12 लाख रुपये कमावले असते तर 12 लाखांच्या उत्पन्नावर सरकारने तुमच्या पगाराचा एक चतुर्थांश हिस्सा परत घेतला असता. आज इंदिराजींची वेळ असती तर 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 लाख रुपये टॅक्समध्ये गेले असते. 10-12 वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावले तर 2 लाख 60 हजार रुपये कर भरावा लागत असे. भाजप सरकारच्या कालच्या अर्थसंकल्पानंतर वर्षभरात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.
अर्थसंकल्पावरही भाष्य
मोदींनी काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावरही भाष्य केलं. ते म्हणाले, आता कॅन्सर आणि गंभीर आजारांवरील 30 हून अधिक औषधे स्वस्त होणार आहेत. आपल्या तरुणांना जास्तीत जास्त संधी आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात, ही भाजप सरकारची प्राथमिकता आहे. या अर्थसंकल्पात क्रीडा बजेट 3,800 कोटी रुपये करण्यात आले असून, 'खेलो इंडिया मोहिमे'साठी 1,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. खेळाच्या नावाखाली आप-डीए आणि काँग्रेसने दिल्लीतील जनतेचा कसा विश्वासघात केला आहे, हे दिल्लीतील जनता कधीही विसरू शकत नाही.












Click it and Unblock the Notifications