Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PM modi : 'एआय मुळे नोकऱ्या जाणार का? - 'AI समिट'मध्ये PM मोदींचे महत्वाचे भाष्य, वाचा 5 मुद्द्यात

PM modi at ai summit 2026 : "तंत्रज्ञान हे मानवाचा पर्याय बनण्यासाठी नाही, तर मानवी क्षमतांना अधिक सक्षम करण्यासाठी आहे," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 'एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) भविष्याबद्दलची भारताची दृष्टी मांडली.

१७ फेब्रुवारीच्या सायंकाळी तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दिग्गजांच्या उपस्थितीत बोलताना, पंतप्रधानांनी एआयमुळे नोकऱ्या जाणार या भीतीवर सडेतोड भाष्य केले. "इतिहासात तंत्रज्ञानाने कधीही काम संपवले नाही, तर त्याचे स्वरूप बदलले आहे," असे सांगत त्यांनी भारतीय तरुणांना एआयला भीती न मानता 'संधी' म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले.

PM modi at ai summit 2026

१. 'एआय' नोकऱ्या संपवणार नाही, तर कामाचे स्वरूप बदलेल

पंतप्रधानांनी नोकरी जाण्याच्या भीतीला स्पष्टपणे उत्तर दिले. ते म्हणाले की, "इतिहासाने हे सिद्ध केले आहे की जेव्हा जेव्हा नवीन तंत्रज्ञान आले, तेव्हा काम पूर्णपणे संपले नाही, तर त्याचे स्वरूप बदलले आहे. एआयमुळे जुन्या पद्धतीच्या कामांची जागा नवीन प्रकारच्या रोजगारांच्या संधी घेतील."

२. तयारी हाच भीतीवर सर्वोत्तम उतारा

तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या भीतीवर बोलताना मोदींनी 'तयारी' या शब्दावर भर दिला. युवकांनी आणि व्यावसायिकांनी एआयशी जुळवून घेण्यासाठी स्वतःला अपडेट करणे आवश्यक आहे. जर आपण काळाप्रमाणे कौशल्ये विकसित केली, तर तंत्रज्ञानाचे आव्हान न वाटता ती एक संधी वाटेल, असे त्यांनी नमूद केले.

३. एआय एक 'फोर्स मल्टिप्लायर'

पंतप्रधानांनी एआयचे वर्णन 'फोर्स मल्टिप्लायर' असे केले. म्हणजेच, हे तंत्रज्ञान मानवी काम हिरावून घेणार नाही, तर मानवी क्षमता अनेक पटींनी वाढवेल. यामुळे व्यावसायिक अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतील आणि कमी वेळेत अधिक उत्पादकता वाढवून नवीन आर्थिक संधी निर्माण होतील.

४. आयटी क्षेत्रात ४०० अब्ज डॉलर्सची झेप

भारताच्या आयटी क्षेत्राच्या प्रगतीबद्दल बोलताना PM मोदींनी सांगितले की, २०३० पर्यंत भारताचे आयटी क्षेत्र ४०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. स्टॅनफोर्ड ग्लोबल एआय व्हायब्रन्सी इंडेक्स २०२५ मध्ये भारत आधीच तिसऱ्या क्रमांकावर असून, एआयमुळे या क्षेत्रात रोजगाराच्या लाखो नवीन वाटा खुल्या होतील.

५. अंतिम निर्णय नेहमी 'मानवाचाच' असेल

"तंत्रज्ञान मानवतेची सेवा करण्यासाठी आहे, ती बदलण्यासाठी नाही," असे सांगत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, एआय कितीही प्रगत झाले तरी निर्णय घेण्याची अंतिम जबाबदारी आणि नियंत्रण हे नेहमी मानवाच्या हातातच राहिले पाहिजे. एआय मानवाला मदत करेल, पण मानवाची जागा घेऊ शकणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+