Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विनोद कुमार शुक्ल यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन, वाचा त्यांच्याविषयी!

Jnanpith Award Winning Writer Vinod Kumar Shukla Passes Away : हिंदी साहित्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, कवी, कादंबरीकार आणि नुकतेच ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही महिन्यांपासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते आणि रायपूर येथील एम्स (AIIMS) रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने भारतीय साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली असून एक निगर्वी आणि प्रयोगशील लेखक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Vinod Kumar Shukla Passes Away

छत्तीसगडचे पहिले 'ज्ञानपीठ' मानकरी

विनोद कुमार शुक्ल यांना महिनाभरापूर्वीच भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान 'ज्ञानपीठ पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्ञानपीठचे महाव्यवस्थापक आर.एन. तिवारी यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन देवी सरस्वतीची प्रतिमा आणि पुरस्काराचा धनादेश सुपूर्द केला होता. हा बहुमान मिळवणारे ते छत्तीसगडमधील पहिलेच साहित्यिक ठरले होते.

"लेखन माझ्यासाठी श्वास घेण्यासारखे"

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या २५ व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. त्या भेटीत शुक्ल यांनी साहित्याप्रती असलेली आपली ओढ व्यक्त करताना म्हटले होते की, "लेखन माझ्यासाठी श्वास घेण्यासारखे आहे." आजारपणातही त्यांची जिद्द कायम होती; "मला लवकरात लवकर घरी जाऊन पुन्हा लिहायचे आहे," असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले होते.

भाषेच्या संकटावर मांडले परखड विचार

शुक्ल हे केवळ लेखक नव्हते तर भाषेचे रक्षक होते. आपल्या एका भेटीदरम्यान त्यांनी वर्तमानातील भाषेच्या स्थितीवर भाष्य केले होते:

"जेव्हा हिंदीसह सर्व भाषांवर संकट आल्याची चर्चा होते, तेव्हा मला पूर्ण आशा आहे की नवीन पिढी प्रत्येक भाषेचा आणि विचारसरणीचा आदर करेल. कोणत्याही भाषेचा किंवा चांगल्या कल्पनेचा नाश म्हणजे मानवतेचा नाश होय."

साहित्यातील योगदान आणि 'जादूई वास्तववाद'

विनोद कुमार शुक्ल यांच्या लेखनाची शैली अत्यंत साधी पण तितकीच खोलवर परिणाम करणारी होती. त्यांच्या 'नौकर की कमीज' या कादंबरीने त्यांना जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या साहित्यात सामान्य माणसाचे जगणे, त्यातील विसंगती आणि एक प्रकारचा 'मॅजिकल रिअलिझम' (जादूई वास्तववाद) पाहायला मिळतो. मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठीही त्यांनी विपुल लेखन केले.

नव्या पिढीला संदेश आणि टीकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन

त्यांनी नव्या पिढीला नेहमीच समृद्ध साहित्याशी जोडले जाण्याचा सल्ला दिला. "प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात किमान एक पुस्तक लिहावे," असे त्यांचे मत होते. टीकेबद्दल बोलताना ते म्हणाले होते की, "जर चांगल्या कामावर टीका झाली, तर तीच तुमची ताकद बनते. कवितेची सर्वोत्तम टीका म्हणजे दुसरी अधिक चांगली कविता लिहिणे होय."

विनोद कुमार शुक्ल यांचा संक्षिप्त परिचय!

  • जन्म: १ जानेवारी १९३७ (राजनंदगाव, छत्तीसगड)
  • प्रमुख साहित्य: 'नौकर की कमीज', 'खिलेगा तो देखेंगे' (कादंबऱ्या), 'सब कुछ होना बचा रहेगा' (कवितासंग्रह).
  • पुरस्कार: ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, शिखर सन्मान.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+