Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकचे 50 ड्रोन हल्ले केले निष्क्रिय! पाकिस्तानच्या 'या' शहरांवर भारताचा प्रहार! रात्रीत काय घडलं?

India Pakistan War 50 Pak drone attacks neutralized India : पाकिस्तानने हमास स्टाईल हल्ले केल्यानंतर त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने काल रात्रीतून जवळपास 50 ड्रोन हल्ले केले. यातील एकाही हल्ल्यात भारताचे काहीही नुकसान झाले नाही. पाकिस्तान भारताच्या केसालाही धक्का लावू शकलेला नाही. उलट आरंभ हैं प्रचंड..नुसार भारताने पाकिस्तानच्या घरात घूसून त्यांची यंत्रणा नष्ट केली.

India Pakistan War 50 Pak drone attacks neutralized India

एनआयने संरक्षण सूत्रांच्या हवाल्यानुसार वृत्त दिले. काल रात्री, नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा (IB) वर विविध ठिकाणी पाकिस्तानने झुंड ड्रोन पाठवण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. तेव्हा उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सने मोठ्या प्रमाणात काउंटर-ड्रोन ऑपरेशन केले. या कारवाईत L-70 तोफा, Zu-23mm, Schilka प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-UAS उपकरणांचा व्यापक वापर करण्यात आला, ज्यामुळे हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी सैन्याची मजबूत क्षमता दिसून आली असे या वृत्तात म्हटले आहे.

भारतीय लष्कराने म्हटले आहे की, "पाकिस्तानी सशस्त्र दलांनी 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आले आणि सीएफव्हींना योग्य उत्तर देण्यात आले."

पाकिस्तानचे 'या' अकरा शहरावर हल्ले अयशस्वी

जम्मू, आरएस, पुरा, सांबा, अर्निया, अखनूर, तंगधार, केरन, कर्णह, पठाणकोट, पोखरण, जैसलमेर, या सर्व क्षेत्रांमध्ये पाकने हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण ब्लॅकआउट करून भारतातर्फे जलद लष्करी कारवाई करण्यात आली.

भारताचा प्रत्युत्तरात या शहरावर हल्ले!

पाकिस्तानने भारतावर हल्ल्यावर हल्ले सुरु केले पण त्याचा बिमोड भारतीय लष्कराने केला. एका रात्रीतच भारताने पाकिस्तानला आपले लष्करी सामर्थ्य दाखवले. भारताने लाहोरजवळील पाकिस्तानी हवाई तळांवर प्रत्युत्तर हल्ला केला. पीओकेमध्ये 3 दहशतवादी लाँच पॅड नष्ट केले, यासह लाहोरची हवाई संरक्षण यंत्रणा देखील नष्ट झाली.

कराची बंदरावर हल्ला

भारतीय नौसेनेनेही पाकिस्तानच्या कराची बंदराला नेस्तनाबूत केले. जेथुन हल्ला करणार आणि ज्या यंत्रणेचा वापर करणार त्यावरच भारताने थेट हल्ला चढवला. भारतीय विक्रांतने पाकिस्तानला लष्करी सामर्थ्य दाखवत सागरी क्षेत्रातही आपले वर्चस्व असल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे. आता भारताचे पुढचे टार्गेट रावळपिंडी असल्याचेही वनइंडिया हिंदीच्या वृत्तात म्हटले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+