Ganesh Chaturthi 2025 Date: गणपती बप्पांचं आगमन कधी होणार? जाणून घ्या तारीख प्रतिष्ठापना शुभ मुहूर्त
Ganesh Chaturthi 2025 Date : ताशाचा आवाज तर्रर्रर्रर..झाला अन् गणपती माझा नाचत आला..सण आला हो आला गौरी गणपतीचा अशी गाणी आता हळू हळू कानी पडत आहेत.ढोल-ताशांचा गजर, फुलांचा सुगंध आणि मोदकांचा गोडवा... होय, आपला लाडका बाप्पा लवकरच घरी येणार आहे! गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली असून, 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने संपूर्ण देश आपल्या लाडक्या गणेशाच्या आगमनासाठी तयार झाला आहे.
गणेश उत्सव म्हणजे तमाम मराठी जनांचा मोठा महोत्सवच. हा केवळ एक दिवसाचा सण नाही, तर तो १० दिवसांचा महोउत्सव आहे. यात भक्ती, संगीत आणि उत्साह दिसतो. गणपतीबाप्पा आपल्यासोबत असताना कोणतीही अडचण मोठी नसते, हा विश्वास या उत्सवाद्वारे मिळतो.

अनेकांना गणरायाच्या आगमानाची प्रतिक्षा आहे , म्हणूनच यंदा गणेश चतुर्थी कधी आहे आणि मुहूर्त काय आहे हे आपण जाणून घेऊया. ज्यामुळे तुम्हाला सुट्ट्यांचे नियोजन आणि तयारी करण्यास मदत मिळेल.
गणेश चतुर्थी २०२५ कधी आहे?
- हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी तिथी सुरू: २६ ऑगस्ट, दुपारी १:५४ वाजता
- गणेश चतुर्थी तिथी समाप्त: २७ ऑगस्ट, दुपारी ३:४४ वाजता
गणपती बप्पांची प्रतिष्ठापना कधी करायची : बाप्पाला घरी आणण्यासाठी आणि प्रतिष्ठापना करण्यासाठी सर्वात शुभ वेळ २७ ऑगस्ट रोजी मध्यान्हाची आहे.
गणेश चतुर्थी: शुभ मुहूर्त
गणेश प्रतिष्ठापना केवळ मूर्ती ठेवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती भक्ती आणि विश्वाच्या लयाचे एकत्रीकरण आहे. तुमच्या शहरात बाप्पाचे स्वागत करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे हे जाणून घेऊया.
महाराष्ट्रात २७ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत सकाळी ११:२४ ते दुपारी १:५५, पुणे: सकाळी ११:२१ ते दुपारी १:५१ या वेळत शुभमुहूर्त आहे. यानुसार, महाराष्ट्रात शुभमुहूर्त पाळता येणार आहे. मुहूर्त पूजा आणि प्रतिष्ठापनेसाठी सर्वात शुभ मानले जातात, ज्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या घरी सहजपणे प्रवाहित होतो.
विविध शहरांमध्ये गणेश चतुर्थी साजरी करण्याची पद्धत
मुंबई : मुंबई हे शहर उत्सवाच्या काळात भक्तीमय जत्रेत रूपांतरित होते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि विसर्जन मिरवणुकीतील गर्दी, मुंबईची गणेश चतुर्थी खरोखरच जादुई असते.
पुणे : संस्कृतीचे शहर असलेल्या पुण्यात इतिहास आणि भक्ती यांचा संगम पाहायला मिळतो. प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीला लाखो भाविक भेट देतात, तर स्थानिक मंडळे शास्त्रीय संगीत आणि महाप्रसादाचे आयोजन करून परंपरा जिवंत ठेवतात.
दिल्ली, बंगळुरुत कसा साजरा होतो गणेश उत्सव?
दिल्लीत ठिकठिकाणी भव्य गणेश मंडप उभारले जातात, जे झेंडूच्या फुलांच्या माळा आणि दिव्यांनी उजळून निघतात. येथील भजनांपासून ते मिरवणुकांपर्यंत, राजधानीचा उत्साह अतुलनीय असतो. बंगळूरूत दक्षिण भारतीय परंपरा आणि महाराष्ट्रीयन उत्साह यांचा सुंदर मिलाफ होतो. पर्यावरणपूरक मूर्ती, घरासमोर काढलेल्या रांगोळ्या आणि ढोलांच्या गजराने येथील रस्ते भरून जातात.
गणपती बप्पा आपल्याला काय शिकवतो?
जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतो, तेव्हा तो केवळ मोदक आणि गाण्यांचा आशीर्वाद देत नाही, तर तो आपल्याला नकारात्मकता दूर करायला शिकवतो, धैर्याने आव्हानांना सामोरे जायला शिकवतो आणि आनंदाने आयुष्य जगायला शिकवतो. उत्सवाचे हे दहा दिवस बाह्य आनंदासोबतच आंतरिक शुद्धीकरणासाठीही असतात.
बप्पा येण्यापुर्वी हे करा
- गणपती बाप्पासाठी तुमचे दरवाजे, मन आणि घर खुले करा.
- मध्यान्हाच्या शुभ मुहूर्तावर त्याचे स्वागत करा.
- गणपती बप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि मोठ्या भक्तीभावाने आरती करा.
- विसर्जनाची वेळ आल्यावर, त्याला प्रेमाने निरोप देताना वचन द्या - "बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!" असेही बोला.












Click it and Unblock the Notifications