Eid 2025 : ईदपूर्वी 32 लाख मुस्लिम समाजाला मिळाली खास भेट! भाजपची 'सौगाद ए मोदी' काय आहे? जाणून घ्या
Eid 2025 : मुस्लीम धर्मियांचा अत्यंत महत्वाचा आणि मोठा सण म्हणजे रमजान ईद भारतासह समस्त जगभरात हा सण साजरा होतो. ईद हा मुस्लिम समुदायासाठी सर्वात पवित्र सणांपैकी एक आहे, जो अत्यंत उत्साहात आणि एकोप्याने साजरा केला जातो. यावेळी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेऊन मुस्लिमांना या खास प्रसंगी खास भेट दिली आहे.
या योजनेंतर्गत देशभरातील 32 लाख मुस्लिमांना 'सौगत-ए-मोदी' किट दिले जाणार आहेत. या उपक्रमाचे देशभरातून कौतुक होत आहे. विशेषत: अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या सेवकांनी त्यांचे कौतुक केले आहे. या उपक्रमामुळे समाजात एकता आणि बंधुता दृढ होईल आणि गरजूंना मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काय आहे भाजपची 'सौगत-ए-मोदी' योजना?
ईदनिमित्त खास 32 लाख मुस्लिमांना थेट लाभ मिळणार आहे. खासकरुन गरीब कुटुंबांना लाभ मिळेल. ही योजना विशेषत: अशा गरीब मुस्लिम कुटुंबांसाठी फायदेशीर ठरेल, जे आर्थिक अडचणींमुळे सण योग्य प्रकारे साजरा करू शकत नाहीत.
'सौगत-ए-मोदी' किट काय आहे?
'सौगत-ए-मोदी' हे भारतीय जनता पक्षाने (भाजप) ईदनिमित्त देशभरातील 32 लाख मुस्लिमांना दिलेले खास किट आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हा पुढाकार घेतला असून याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट म्हणून पाहिले जात आहे.
या किटमध्ये काय असेल?
ज्या प्रमाणे महाराष्ट्र सरकार सणावेळी खास शिधा देते तशीच ही किट असेल. या किटमध्ये गरजू कुटुंबांसाठी रेशन आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे, जेणेकरून ते रमजान आणि ईद चांगल्या प्रकारे साजरी करू शकतील.
काय म्हणाले अजमेर दर्ग्याचे शासक?
अजमेर दर्ग्याचे शासक आणि चिश्ती फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सलमान चिश्ती यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि हे एक स्तुत्य पाऊल असल्याचे सांगितले. त्यांनी हा सामाजिक सलोखा वाढविण्याचा उपक्रम असल्याचे सांगितले आणि अशा प्रयत्नांमुळे देशातील बंधुभाव दृढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हाजी पीर सय्यद नफीस मियाँ चिश्ती यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. अशा योजनांमुळे समाजात प्रेम आणि एकोपा वाढतो, असे ते म्हणाले. यामुळे ज्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा अंतर आहे, त्यांच्या विचारसरणीत बदल होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 'सौगत-ए-मोदी' किट योजनेमुळे लाखो मुस्लिम कुटुंबांना मदत होईल आणि ते आनंदाने सण साजरा करू शकतील. या उपक्रमामुळे केवळ गरजूंना मदत होणार नाही तर समाजात एकता आणि बंधुतेचा संदेशही मिळणार आहे.












Click it and Unblock the Notifications