Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संरक्षण प्रमुखांकडून पाकिस्तानची पोलखोल! ऑपरेशन सिंदूरदरम्यान रिकामे ड्रोन डागले! देशाला नुकसान नाही

Defence Chief Manoj Chauhan exposed Pakistan : सिंदूर ऑपरेशनदरम्यान, पाकिस्तानकडे फारशी शस्त्रास्त्रे नसल्याचे स्पष झाले आहे. "पाकिस्तानने भारतावर निःशस्त्र ड्रोन आणि जुनाट दारुगोळ्याचा वापर केला. यापैकी कोणत्याही हल्ल्यात भारतीय लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधाचे नुकसान झाले नाही" असे भारतीय संरक्षण प्रमुखांनी म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तान सिंदूर ऑपरेशनदरम्यान किती हतबल होता हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Defence Chief Manoj Chauhan

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय लष्कराने 7 मे 2025 रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, जे 10 मे पर्यंत चालले. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आणि पाकिस्तानी हवाई तळावरही हल्ला करण्यात आला होता. यानंतर पाकिस्तानला नानी याद आली आणि त्यांनी भारताकडे हल्ले थांबवण्याची याचना केली. त्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी लष्करी दलाचे महत्वाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि संघर्षविरामावर शिक्कामोर्तब केलं.

पाकिस्तानने सिंदूर ऑपरेशनदरम्यान भारतावर केलेल्या हल्ल्यात काहीही नुकसान झाल्याचे संरक्षणप्रमुख अनिल चौहाण यांनी म्हटले आहे. संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी मानेकशॉ सेंटरमध्ये यूएव्ही आणि सी-यूएएस क्षेत्रात सध्या परदेशी ओईएमकडून आयात केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या घटकांच्या स्वदेशीकरणावरील प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले संरक्षणप्रमुख अनिल चौहाण?

संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान म्हणाले, "10 मे रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने नि:शस्त्र ड्रोन आणि लपून बसलेल्या दारूगोळ्यांचा वापर केला. त्यापैकी कोणत्याही हल्ल्याने भारतीय लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधांना कोणतेही नुकसान पोहोचवले नाही. बहुतेकांना गतिज आणि नॉन-गतिज साधनांच्या संयोजनाने निष्क्रिय केले गेले आणि काही जवळजवळ अबाधित स्थितीत परत मिळवले गेले..."

संरक्षणात गुंतवणूक करायला हवी

संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरने आम्हाला दाखवले आहे की, आमच्या भूभागासाठी बनवलेल्या स्वदेशी विकसित काउंटर-यूएएस प्रणाली का महत्त्वाच्या आहेत. आम्ही स्वतःचे रक्षण करण्यासाठी गुंतवणूक आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभारायला हवे."

युद्धात ड्रोनच्या वापरावर बोलताना, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान म्हणाले, "जेव्हा आपण ड्रोनबद्दल बोलतो तेव्हा तुम्हाला काय वाटते - ते उत्क्रांतीवादी बदल आणत आहेत की युद्धात क्रांतिकारी बदल आणत आहेत? मला वाटते की त्यांचा विकास उत्क्रांतीवादी आहे आणि त्यांचा वापर युद्धात खूप क्रांतिकारी झाला आहे... त्यांच्या तैनाती आणि व्याप्तीची जाणीव वाढत असताना, सैन्याने क्रांतिकारी पद्धतीने ड्रोनचा वापर सुरू केला, तुम्ही हे आमच्याद्वारे लढलेल्या अनेक युद्धांमध्ये पाहिले आहे..."

पहलगाम हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. अहवालानुसार, या हल्ल्यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LET) यांचा हात होता आणि संपूर्ण कारवाई पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाच्या सूचनेनुसार करण्यात आली होती.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+