Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केंद्रीय अर्थसंकल्प 2025 बद्दल विरोधकांना काय वाटतंय? वाचा, विरोधकांच्या मनातील खदखद

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी (01 फेब्रुवारी) संसदेत सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा आयकराबाबत करण्यात आली आहे. आता 12 लाखांपर्यंतच्या कमाईवर शून्य कर लागणार असल्याने नोकरदारांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. याशिवाय मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रासाठी काही ना काही घोषणा केल्या आहेत. एकीकडे सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या NDA मित्रपक्षांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले, तर दुसरीकडे विरोधी पक्षांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊयात...

Budget 2025

जेथे निवडणुका त्यांनाच...

केंद्रीय अर्थसंकल्पावर शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, "जिथे निवडणुका येत आहेत त्या राज्यांची नावे सर्वात जास्त घेतली गेली. बिहार, आसामवर कृपादृष्टी झाली. पंजाबचे नावही घेतले गेले नाही. जिथे शेतकरी एमएसपीच्या हमीभावासाठी संपावर आहेत. शेतकऱ्यांचा लढा अजिबात ऐकला नाही याचे मला दुःख आहे.

प्रत्येक आकडा खोटा - यादव

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव अर्थसंकल्पावर म्हणाले की, आज आमच्यासाठी महाकुंभ चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्यांची आकडेवारी अर्थसंकल्पातील आकडेवारीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. या सरकारला जीव गमावलेल्यांची आणि बेपत्ता झालेल्यांची आकडेवारी सांगता आली नाही. ही आकडेवारी सांगायला 17 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. कुंभमेळ्यात ४० कोटी लोकांसाठी व्यवस्था करायची होती, मग काय व्यवस्था केली..? हे सरकार लबाड आहे, जे सरकार महाकुंभ आयोजित करू शकत नाही, त्याचा आजच्या अर्थसंकल्पातील प्रत्येक आकडा खोटा आहे.

कमकुवत अर्थसंकल्प - गौरव गोगोई

काँग्रेस खासदार गौरव गोगोई केंद्रीय अर्थसंकल्पावर म्हणाले की, "तोच जुना अर्थसंकल्प आहे. जो आपण गेल्या 10 वर्षांपासून ऐकत आहोत. गरीबांना, शेतकऱ्यांना, मध्यमवर्गाला काही मिळालेले नाही. ते काही दाखवतात. ही सरकारची जुनी पद्धत आहे आणि आम्ही तपशीलवार पाहिल्यावर लक्षात येते की या अर्थसंकल्पातून काहीही सापडले नाही."

हा बिहारचा अर्थसंकल्प - तिवारी

काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले, "हा अर्थसंकल्प भारत सरकारचा आहे की बिहार सरकारचा आहे हे मला समजत नाही. अर्थमंत्र्यांच्या संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणात फक्त बिहारचा उल्लेख होता. संपूर्ण देशासाठी काही तरी असायला हवे होते. हे सरकार ज्यांच्यावर चालत आहे, त्याचाच विकास होत आहे. उर्वरित देश अस्थिर आहे."

बिहारच्या निवडणुका आल्या- चतुर्वेदी

शिवसेना (UBT) च्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सरकारचे कान टोचले. त्या म्हणाल्या, "मध्यमवर्गाचा सर्वात मोठा विजय झाला, असं मी म्हणेल. 240 जागा मिळवण्याचा हा विजय आहे. आम्हाला आमच्या पगारापेक्षा जास्त कर द्यावा लागतो, ही मध्यवर्गीयांची गेल्या 10 वर्षांपासूनची ओरड होती. आज अखेर त्यांच्या मागण्या ऐकल्या गेल्या. बिहारमध्ये दरवर्षी निवडणुका व्हायला हवी, असं आजच्या अर्थसंकल्पावरुन म्हणता येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

बरेच नवीन प्रस्ताव - कार्ती चिदंबरम

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम केंद्रीय अर्थसंकल्पावर म्हणाले, "कोणताही तपशील देण्यापूर्वी आम्हाला अर्थसंकल्प पाहावा लागेल. कारण सैतान नेहमीच तपशीलांमध्ये लपलेला असतो. तेथे बरेच नवीन प्रस्ताव आहेत. गेल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या प्रस्तावांचे काय झाले, तेही पाहावे लागेल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+