'पुढील 5 वर्षांसाठी तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे हे प्राधान्य असेल'- अरविंद केजरीवाल
Delhi Assembly Elections 2025: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी 2025 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रोजगार निर्मितीला आपले पुढचे प्राधान्य देण्याचे आश्वासन दिलं आहे. केजरीवाल यांनी दावा केला की, त्यांच्या सरकारने गेल्या कार्यकाळात शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या आहेत. आता रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे त्यांचे पुढचे मोठे लक्ष्य, असेल असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
रोजगार निर्मितीसाठी मोठी आश्वासने
दिल्लीतील निवडणूक रॅलीला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, गेल्या 10 वर्षात आम्ही शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत दिल्लीला नवीन उंचीवर नेले आहे. आता आमचे मुख्य उद्दिष्ट तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक घरात किमान एका व्यक्तीला रोजगार मिळेल.

मेक इन दिल्ली योजनेवर भर
सरकारच्या मेक इन दिल्ली योजनेचा उल्लेख करताना केजरीवाल म्हणाले की, ही योजना केवळ तरुणांना रोजगार देणार नाही तर उलट ते दिल्लीला एक व्यवसाय केंद्र म्हणून स्थापित करेल. आम्ही लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊ, स्टार्टअप्ससाठी अनुकूल वातावरण निर्माण करू आणि व्यावसायिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांचे व्यवसाय वाढवू देऊ.
शिक्षण आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणार
दिल्ली कौशल्य आणि उद्योजकता विद्यापीठ तरुणांना आधुनिक आणि उद्योगाशी संबंधित कौशल्ये प्रदान करेल. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे. सरकारी प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढवली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
अगले 5 साल में हमारी सबसे बड़ी प्राथमिकता हमारे युवाओं के लिए रोज़गार और नौकरियाँ पैदा करना होगी। https://t.co/ZM6Hwc62rw
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 23, 2025
मागील कामगिरीचा उल्लेख
शिक्षण, आरोग्य आणि वीज-पाणी या क्षेत्रातील दिल्ली सरकारच्या यशस्वी योजनांचा उल्लेख करताना केजरीवाल म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली आज सरकारी शाळा खाजगी शाळांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत. दिल्लीतील लोकांना आम्ही दिलेली आश्वासने माहित आहेत. त्या पूर्ण केले. आता आमचे स्वप्न आहे की रोजगाराच्या बाबतीत दिल्लीला आघाडीवर आणायचं आहे.
भाजप आणि कॉंग्रेसकडून आपवर टीका
मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने याला निवडणूक स्टंट म्हटलं आहे. आपने यापूर्वीही रोजगाराचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. भाजप नेत्याने म्हटले की, केजरीवाल सरकारने आधी त्यांच्या मागील आश्वासनांचा हिशेब द्यावा. बेरोजगारी वाढली आहे आणि रोजगार निर्मितीचे दावे फक्त कागदोपत्री मर्यादित आहेत.












Click it and Unblock the Notifications