Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

तो नियम मोदींना लागू होत नाही का ? अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना 5 प्रश्न

Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच ते लोकांसमोर आले. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या 'जनता की अदालत' कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारण्यात आले आहेत, ज्यात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या राजकीय रणनीतींचे नैतिकता आणि परिणामांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले आहेत. बोलायचे झाले तर हे फक्त 5 प्रश्न आहेत, पण या प्रश्नांमध्येच इतर अनेक प्रश्न आहेत. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या भाषणाचा काही भाग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना कोणते 5 प्रश्न विचारले आहेत ते जाणून घेऊया.

arvind kejriwal

(1) अरविंद केजरीवाल यांनी मोहन भागवतांना पहिला प्रश्न विचारताना म्हणाले की, मोदीजी ज्या प्रकारे देशभरातील लोकांना आमिष दाखवून किंवा ईडी, सीबीआयचा धाक दाखवून इतर पक्षांचे नेते फोडत आहेत आणि सरकार पाडत आहेत. हे देशाच्या लोकशाहीसाठी चांगले आहे का? हे भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे, यावर तुमचा विश्वास नाही का?

(2) अरविंद केजरीवाल म्हणाले भाजपने देशातील सर्वात भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षात सहभागी केले आहे. ज्या नेत्यांना काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भ्रष्ट म्हटले होते, त्यांचा काही दिवसांनी भाजपमध्ये समावेश? अशा भाजपची कल्पना केली होती का? हे राजकारण तुम्हाला पटते का?

(3) केजरीवाल म्हणाले भाजप भरकटणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी संघाची आहे, असे म्हणतात. आजच्या भाजपच्या पावलाशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही कधी पंतप्रधान मोदींना हे सर्व करू नका, असे सांगितले आहे का?

4) केजरीवाल म्हणाले निवडणुकीदरम्यान भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते की, भाजपला संघाची गरज नाही. आरएसएस ही भाजपची आई समान आहे. अरविंद केजरीवाल यांनी मोहन भागवतांना विचारले की, मुलगा इतका मोठा झाला आहे की, तो आईला डोळे दाखवू लागला आहे का? ज्या मुलाला त्यांनी मोठे केले आणि देशाचा पंतप्रधान बनवला. आज तो आपल्या मातृसंस्थेला डोळे दाखवत आहे. केजरीवाल यांनी मोहन भागवतांना विचारले की, जेपी नड्डा यांनी हे सांगितले तेव्हा तुम्हाला वाईट वाटले नाही का? प्रत्येक संघ कार्यकर्ता दु:खी नव्हता का?

(5) केजरीवाल यांनी मोहन भागवतांना पाचवा प्रश्न विचारला. केजरीवाल म्हणाले RSS आणि भाजपने मिळून असा कायदा केला की, कोणत्याही व्यक्तीला वयाची 75 वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्त व्हावे लागेल. या कायद्यानुसार लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांसारखे बडे नेतेही निवृत्त झाले. आता तो नियम मोदींना लागू होणार नाही, असे अमित शहा सांगत आहेत. जो नियम अडवाणींना लागू होता तो मोदीजींना लागू होणार नाही हे मोहन भागवतांना मान्य आहे का?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+