तुम्ही मीठ खाताय की, विष! जेवणात कमी सोडियम मीठ वापरा, WHO चा सल्ला, जास्त मीठ खाण्याचे तोटे, वाचा
Health News : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आरोग्याच्या समस्या उद्भवू नये म्हणून कमी सोडियमयुक्त मीठ वापरण्याचे आवाहन केले आहे. 'हु' संस्थेने म्हटले आहे की नियमित मीठ जे खातो त्यात बदल करुन पोटॅशियम युक्त कमी-सोडियम असलेल्या मिठाचा भोजणात वापर करायला हवा. हा सल्ला खासकरुन प्रौढ आणि निरोगी व्यक्तींसाठी महत्वाचा आहे.
आरोग्य संघटनेची ही शिफारस गरोदर स्त्रिया, मुले आणि मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी नाही, ज्यांना सामान्य मीठ खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डब्ल्यूएचओ आधीच हृदय आणि मूत्रपिंड समस्या टाळण्यासाठी सोडियमचा वापर दररोज 2 ग्रॅमपर्यंत कमी करण्याचा सल्ला देते आहे.

मीठ किती प्रमाणात सेवन करावे
मीठ जास्त किंवा कमी खाऊ नये, परंतु संतुलित प्रमाणात घेतले पाहिजे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, एखाद्या व्यक्तीने दररोज 5 ग्रॅम मीठ खावे, परंतु भारतीय लोक सरासरी 10 ग्रॅम मीठ खातात. जास्त मीठ शरीरात सोडियमचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि किडनी सारख्या समस्या उद्भवू शकतात.
WHO मार्गदर्शक तत्त्वे
विशेषत: भारतीय संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) या शिफारशीचे तज्ञांनी कौतुक केले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की डब्ल्यूएचओची मार्गदर्शक तत्त्वे भारतीयांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, कारण भारतीयांना अतिरिक्त मीठ खाण्याची सवय आहे.
- भारतीयांमध्ये जेवण करताना टेबलावर मिठाचा डबा ठेवण्याची आणि खाण्यापूर्वी जास्त मीठ खाण्याची परंपरा आहे.
- या सवयीमुळे आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे WHO चा हा निर्णय भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे.
- तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भारतीयांनी ही शिफारस गांभीर्याने घ्यावी आणि मिठाचे सेवन संतुलित ठेवावे.
विषासारखे आहे मीठ
जास्त मीठ शिरांमध्ये पाण्याचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे डिहायड्रेशन, हाडे कमकुवत होणे आणि पोटाचा त्रास होऊ शकतो. म्हणून, WHO मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन, या आरोग्य समस्या टाळण्यासाठी आणि एकंदर आरोग्य राखण्यासाठी भारतीयांनी मिठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
जास्त मीठ खाण्याचे तोटे
- जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
- यामध्ये रक्तदाब वाढणे, हृदयविकार, हाडे कमकुवत होणे
- पोटाच्या समस्या, किडनीचे आजार यांचा समावेश होतो.
- याव्यतिरिक्त, जास्त मीठ वजन वाढणे, निर्जलीकरण आणि त्वचेच्या समस्या होऊ शकते.
या कारणास्तव, संतुलित प्रमाणात मीठ सेवन करणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून हे आरोग्य धोके टाळता येतील.












Click it and Unblock the Notifications