अर्थसंकल्पात शेतकऱ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना काय मिळणार? बजेट समजून घ्या 'या' 8 मुद्द्यातून
मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 23 जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, वृद्ध, तरुण आणि महिलांवर भर देण्यात आला आहे.
अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्र आणि रेल्वे क्षेत्र वगळता प्रत्येक विभागासाठी तरतूद आहे. शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकास क्षेत्र, कृषी क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रत्येक क्षेत्राला बजेटमध्ये काय मिळाले आहे ते जाणून घेऊया?

अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रात काय मिळाले?
1. पीएम पॅकेजची घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ''मला 2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चासह 5 वर्षांतील 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्ये आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पाच योजना आणि उपक्रमांची घोषणा करताना आनंद होत आहे.
- उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ही योजना प्रथमच उत्पादन क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देईल. या योजनेत, कर्मचारी आणि नियोक्ते यांना विशिष्ट प्रमाणात प्रोत्साहन दिले जाईल.
- या योजनेमुळे उत्पादन क्षेत्रात येणाऱ्या 30 लाख तरुणांना आणि त्यांच्या नोकरदारांना मदत होणार आहे.
- 1 लाख रुपये पगार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
- 'प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्याच्या EPFO योगदानासाठी केंद्र सरकार नियोक्त्यांना दरमहा 3000 रुपयांपर्यंतची परतफेड करेल.
- 50 लाख लोकांना अतिरिक्त रोजगार देण्यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली आहे.
2. कौशल्य कर्ज योजना
- मॉडेल स्किल लोन स्कीममध्ये 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सुविधा देण्यासाठी बदल करण्यात येईल. यामुळे दरवर्षी 25 हजार विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.
3. कृषी क्षेत्र: कृषी क्षेत्राला काय मिळाले?
- कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
- येत्या दोन वर्षांत एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीच्या पद्धतींची ओळख करून दिली जाईल.
- एकूण उत्पादन सुधारण्यासाठी भाजीपाला उत्पादन क्लस्टर्स मोठ्या प्रमाणावर स्थापन केले जातील.
- सरकार विशेषत: कृषी क्षेत्रासाठी डिजिटल कृषी पायाभूत सुविधांवर भर देणार आहे.
4. शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकास क्षेत्रातून काय मिळाले?
- 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईल.
- देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. हे दर वर्षी १ लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाउचरद्वारे ३ टक्के व्याजदराने दिले जाईल.
- सरकार हब-अँड-स्पोक मॉडेलचा वापर करून 1,000 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITIs) श्रेणीसुधारित करेल, अभ्यासक्रमाची सामग्री उद्योग कौशल्य आवश्यकतांनुसार संरेखित करेल आणि मॉडेल कौशल्य कर्ज योजनेत बदल करेल.
- पुढील पाच वर्षांत 20 लाख तरुणांना कौशल्य प्रदान केले जाईल.
5. संरक्षण आणि रेल्वे विभागाला काय मिळाले?
- रेल्वे मंत्रालयासाठी घोषणा नाही.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयासाठी कोणतीही विशिष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचा उल्लेखही केलेला नाही.
7. पायाभूत सुविधांचे काय?
- पायाभूत सुविधा क्षेत्रात, सरकारच्या बहुतांश घोषणा बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी करण्यात आल्या आहेत. पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर द्रुतगती मार्ग, बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे.
- बजेटमध्ये बिहारला विविध योजनांतर्गत ५८९०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. यापैकी 26 हजार कोटी रुपयांचा निधी बिहारमध्ये रस्त्यांचे जाळे टाकण्यासाठी आहे. पूरनियंत्रणासाठी 11500 कोटी रुपये आणि वीज प्रकल्पांसाठी 21400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
8. गृहनिर्माण क्षेत्रासाठी काय दिले?
- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भारतात 3 कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
- यावर्षी ग्रामीण विकासासाठी 2.66 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
- 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरे बांधली जातील. यासाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.












Click it and Unblock the Notifications