कानपूर कसोटी यशस्वी जैस्वालने गाजवली! 147 वर्षांमध्ये कुणालाही जमलं नाही ते रोहितसोबत केलं
Ind vs Ban Test Match, Yashasvi Jaiswal : भारतानं आज बांग्लादेशवर ऐतिहासिक विजय मिळवत कसोटी मालिका दोन विरुद्ध शून्य अशा फरकानं जिंकली. कानपूरमधील दुसऱ्या कसोटीची विशेषता म्हणजे अगदी दोन दिवसांतच या सामन्याचा निकाल लागला. आता या कसोटी सामन्यात अनेक विश्वविक्रम झाले असून रोहीत यशस्वी जैस्वाल या जोडीने जे 147 वर्षांमध्ये कुणालाही जमलं नाही ते करुन दाखवलं. यशस्वीने तर आपल्या फलंदाजीची जादू दाखवून सामना आपल्या फिरवला.
कानपूर टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे पूर्ण खेळ होऊ शकला नाही. त्यानंतर दुसरा संपूर्ण दिवस पावसामुळे वाया गेला. तिसऱ्या दिवशीही मैदान ओलं असल्यामुळं खेळ झाला नाही. त्यावेळी ही कसोटी अनिर्णित राहील असेच सर्वांना वाटले पण भारतीय टीमनं सकारात्मक खेळ करत दोन टेस्टची ही सीरिज 2-0 अशा फरकानं जिंकली.

यशस्वी जैस्वाल याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. त्याचे नेत्रदिपक फटके पाहण्याची पर्वणी आज प्रेक्षकांना मिळाली. तो जेव्हा खेळत होता तेव्हा मैदानातून भारत माता की जय असे नारे सुरु होते. विशेष म्हणजे हा सामना कसोटीच आहे ना याची पाहणाऱ्यांना शंका येत होती. कारण हा सामना अगदी वनडे सारखा खेळला गेला. त्याने अर्धशतक साजरं करत 51 धावा केल्या आहेत. 45 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार त्यानं लगावले.
भारतानं हा केला विश्वविक्रम
कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद 100 धावा 10.1 षटकांत केल्या. त्यानंतर जैस्वालला बाहेर पडावे लागले आणि ऋषभ पंतने गिलसोबत मिळून पुढच्या विकेटसाठी अवघ्या 14 धावा केल्या. दुसऱ्या सत्रानंतर, गिल निघून गेल्यावर विराट कोहली क्रमांकावर विलक्षण फलंदाजीसाठी उतरला. 5 आणि पंतबरोबरच्या मिश्रणातून अगदी जवळून धावबाद होण्याची संधी सोडल्यानंतर, त्याने पुढच्या चेंडूवर चौकार मारून भारताला 18.2 षटकात 150 पर्यंत नेले.
एका संघाने कसोटीमध्ये 150 धावा गाठल्याचा हा सर्वात वेगवान धावा आहे कारण भारताने 21.1 षटकांचा त्याच्याच्या विक्रमाला पुन्हा सुधारित केले आहे, त्याच कसोटीमध्ये त्यांनी प्रथम जलद शंभर धावांची नोंद केली आहे. सर्वात वेगवान 50, 100 आणि 150 धावा केल्यानंतर, सर्वात वेगवान 200 अगदी जवळ आले कारण टीम इंडियाने 24.2 षटकात 200 धावांचा टप्पा ओलांडला जेव्हा पंत निघून गेला आणि केएल राहुल कोहलीला पाठिंबा देण्यासाठी आला.
हे फक्त यशस्वी-रोहीतलाच जमलं
कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद 50 धावा
कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद 100 धावा
कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान 200 धावा
कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद 250 धावा
कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) या ओपनिंग जोडीनं पहिल्या 3 ओव्हर्समध्येच 51 रन केले. जो फक्त भारतच नाही तर टेस्ट क्रिकेटमधील कोणत्याही टीमनं पहिल्या 3 ओव्हर्समध्ये केलेले सर्वोच्च रन आहेत. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमनं 50 पेक्षा जास्त रन केले आहेत.












Click it and Unblock the Notifications