Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उद्योगपती कुटुंब, 70 हजार कोटींहून अधिक संपत्ती! भारतीय क्रिकेटपटूची वयाच्या 27 व्या वर्षी निवृत्ती

The richest cricketer Retirement: भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक श्रीमंत खेळाडू कोण म्हणून जर कोणी प्रश्न विचारला तर सहाजिकच विराट, सचिन तेंडूलकर, एम. एस धोनी किंवा अजय जाडेजा या पैकी कोणा एकाचे नाव घेतलं जाईल. पण असा एक भारतीय क्रिकेटर आहे जो भारतातीलच नव्हे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेटर आहे. या क्रिकेटरचं नाव आहे आर्यमन बिर्ला.

कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी निवृत्ती घेऊन त्यांनी सर्वांना धक्का दिला आहे. आर्यमनने मध्य प्रदेशातील भारतीय क्रिकेट संघासाठी रणजी करंडक आणि इतर क्रिकेट स्पर्धा खेळल्या आहेत. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीने त्याला एक वेगळी ओळख दिली आहे, पण यासोबतच तो बिझनेस आणि कॉर्पोरेट जगतातही सक्रिय आहे.

cricketer

आर्यमन 70 हजार कोटींचा मालक

आर्यमनची संपत्ती अंदाजे 70 हजार कोटी रुपये आहे. परंतु हे मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे आणि वास्तविक आकडेवारी सार्वजनिक नाही. मालमत्तेच्या बाबतीत आर्यमन बिर्ला महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या पुढे आहे.

क्रिकेटमधील कारकिर्द

आर्यमनने 2023 मध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडमध्ये संचालक म्हणून पदभार सांभाळला आहे. या भूमिकेतील त्याचे काम कंपनीच्या वाढीवर आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करणे आहे. क्रिकेटमध्ये आर्यमनने अनेक सामन्यांमध्ये आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. खेळातील त्याच्या आवडीमुळे तो एक युवा स्टार बनला आहे.

क्रिकेटची अशी झाली सुरुवात

आर्यमन बिर्लाची कहाणी रंजक आहे. त्याने क्रिकेट जगतात आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष केला. मुंबईत जन्मलेल्या आर्यमनने नंतर मध्य प्रदेशातील रीवा येथे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आर्यमनने ज्युनियर सर्किटमध्ये भाग घेऊन स्वतःला सिद्ध केले. त्याचे रणजी ट्रॉफी पदार्पण 2017 मध्ये ओरिसा विरुद्ध झालं, जिथे त्याने रजत पाटीदार सोबत 72 धावांची भागीदारी केली आणि आपली क्षमता दाखवली होती.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग राहिला

आर्यमनला 2018 मध्ये राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी होऊन आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. असे असूनही त्याच्या क्रिकेट प्रवासात त्याने बंगालविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. ज्यामध्ये त्याने 189 चेंडूत 103 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. आर्यमनने एका मुलाखतीत सांगितले होते की, चांगली कामगिरी करणे हा सन्मान आणि विश्वास मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+