भारत-इंग्लंड T-20 मालिका गाजवणारे 5 खेळाडू कोणते; सर्वात अग्रस्थानी कोणता खेळाडू, जाणून घ्या सविस्तर
IND vs ENG T-20 : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच टी-२० मालिका खेळली गेली. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 4-1 असा विजय मिळवला. या संपूर्ण मालिकेत फलंदाजासोबतच गोलंदाजही मागे दिसूल आले नाही. एका चढी एक असे खेळाडू या मालिकेत चमकदार कामगिरी करताना दिसले. दुसरीकडे, इंग्लंडने मालिका गमावली आणि त्यासाठी त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही जबाबदार असू शकतात.
या मालिकेत फलंदाजांनी गोंधळ निर्माण करून आणि चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून गोलंदाजांवर दबाव आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. चला तर जाणून घेऊया, भारत इंग्लंड मालिकेतील सर्वोत्तम फलंदांजाबद्दल, ज्यांच्या वादळी खेळाने ही मालिका भारताने खिशात टाकली. त्याचबरोबर इंग्लंडचा पराभव झाला असला तरी त्यांच्या काही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे, त्यावर देखील चर्चा करूयात.

बेन डकेट
इंग्लंडच्या या खेळाडूच्या बॅटने चांगली कामगिरी केली नाही पण तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये पाचव्या स्थानावर आहे. बेन डकेटने या मालिकेत एकूण ५ सामने खेळले आणि पाचही सामन्यांमध्ये ९७ धावा केल्या.
हार्दिक पांड्या
अष्टपैलू हार्दिक पांड्याचे नाव चौथ्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने ५ सामन्यात ११२ धावा केल्या. पंड्याच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी दिसून आली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ५३ धावा आहे.
तिलक वर्मा
धाकड खेळाडूंमध्ये समाविष्ट असलेला 22 वर्षीय तिलक वर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये तिलक वर्माने एकट्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. तिलक वर्माने 5 सामन्यात 133 धावा केल्या.
जोस बटलर
सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा जोस बटलर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पाच सामन्यांनंतर बटलरने १४६ धावांचा टप्पा गाठला. तथापि, नंतर त्याच्या बॅटने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही.
अभिषेक शर्मा
मालिकेतील एकमेव शतक करणारा, अभिषेक शर्माचे नाव यादीत सर्वात वर आहे. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावून अव्वल स्थान मिळवले आहे. अभिषेक शर्माने 5 सामन्यांमध्ये 279 धावा केल्या आहेत. त्याने या धावा अंदाजे 56 च्या सरासरीने केल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications