रोहित शर्माच्या जागी कर्णधार कोण? गौतम गंभीर यांच्या पत्रकार परिषदेतील 5 महत्वाचे मुद्दे
Gautam Gambhir Press Conference : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. गंभीर यांनी संघाची सलामीची जोडी आणि विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या फॉर्मबाबतही काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

रोहितच्या जागी कोण येणार?
पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध असेल का ? तसेच पर्थ कसोटीत डावाची सुरुवात कोण करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना गौतम गंभीर म्हणाले की, संघात अभिमन्यू ईश्वरन आणि केएल राहुलसारखे पर्याय आहेत. आमच्याकडे डावाची सुरुवात करण्यासाठी पुरेसे पर्याय आहेत. रोहित पहिली कसोटी खेळला नाही तर कर्णधार कोण होणार? या प्रश्नाच्या उत्तरात गंभीर म्हणाला की, जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. जर रोहित खेळला नाही तर बुमराह कर्णधार असेल.
Mumbai | Ahead of India vs Australia Border Gavaskar Trophy, Indian Cricket Team's head coach Gautam Gambhir says "Bumrah is the Vice Captain. Obviously, he will be the captain in Rohit's absence."
— ANI (@ANI) November 11, 2024
रोहित संघात कधी येणार?
गौतम गंभीरला दुसरा प्रश्न कर्णधार रोहित शर्माबद्दल होता, ज्यामध्ये तो पर्थ कसोटीसाठी संघासोबत उपस्थित आहे का असे विचारण्यात आले होते. यावर गंभीरने उत्तर दिले की, याविषयी अद्याप कोणतेही अपडेट नाही, परंतु आम्ही आशा करतो की तो संघात सहभागी होईल. मालिका सुरू होण्यापूर्वी तो संघात सहभागी होऊ शकतो.
रोहित-कोहलीच्या फॉर्मची चिंता नाही
गौतम गंभीर म्हणाला की, रोहित आणि विराटचा सध्याचा फॉर्म चिंतेचा विषय नाही. या दोन्ही खेळाडूंकडे प्रचंड अनुभव आहे. मुख्य म्हणजे त्यांच्यात अजूनही धावा करण्याची तीव्र इच्छा आहे, ज्यासाठी ते सतत मेहनत घेत आहेत.
Mumbai | On concerns related to Rohit and Virat’s forms ahead of India vs Australia Border Gavaskar Trophy, Indian Cricket Team's head coach Gautam Gambhir says "Not at all...Ricky Ponting should think about Australian cricket, what concerns he has for Indian cricket? Virat and… pic.twitter.com/Y3TITB79lw
— ANI (@ANI) November 11, 2024
ऑस्ट्रेलियन खेळपट्टीबद्दल मोठं विधान
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर बोलताना गंभीर म्हणाला की, ऑस्ट्रेलियाने तयार केलेल्या विकेट्सवर आमचे पूर्ण नियंत्रण नाही. आता आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. संघ निवड करताना आम्ही सर्व बाबी विचारात घेतल्या आहेत. खेळपट्टी उसळलेली असो, टर्निंग असो किंवा हिरवे गवत असो, आम्ही प्रत्येक प्रकारच्या खेळपट्टीसाठी तयारी केली आहे. त्यानुसारच खेळाडूंची निवड केली आहे. आता आम्हाला फक्त तिथे जाऊन आमच्या क्षमतेनुसार खेळायचे आहे. तसे केले तर आपण जिंकू शकतो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर भाष्य
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलबाबत गंभीर म्हणाला की, खरे सांगायचे तर मी सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलबद्दल फारसा विचार करत नाहीये. प्रत्येक मालिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. जसजसा आमचा सामना जवळ येईल तसतसे आम्ही आमच्या सर्वात मजबूत प्लेइंग इलेव्हनचा विचार करू.












Click it and Unblock the Notifications