विक्रमसम्राट विराट! रांची वनडेत 52वे शतक झळकावले; क्रिकेट इतिहासात विश्वविक्रम, तेंडुलकरलही मागे...!
Virat Kohli : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील रांची येथील एकदिवसीय सामना विराट कोहलीच्या ऐतिहासिक खेळीमुळे कायम स्मरणात राहील.
ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सिडनीमध्ये नाबाद ७४ धावांची खेळी केल्यानंतर कोहलीने आज (रविवार) पुन्हा एकदा आपल्या बॅटमधून आग ओकली.
त्याने केवळ ५२ वे एकदिवसीय शतक झळकावले नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर कधीही न झालेला पराक्रम करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आपल्या टीकाकारांनाही आपल्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शतकी खेळीने गोलंदाजांना अडचणीत आणले
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांची वनडेमध्ये विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्मासह मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने आपले ७६ वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर आपल्या डावाला शतकी रूप दिले. कोहलीने या खेळीत रोहित शर्मापेक्षा अधिक वेगवान फलंदाजी केली. १२० चेंडूंमध्ये १३५ धावांची धडाकेबाज खेळी करताना त्याने ११ चौकार आणि सात उत्तुंग षटकार ठोकले. कोहलीने रोहित शर्मासोबत महत्त्वपूर्ण शतकी भागीदारीही केली, ज्याने संघाच्या मोठ्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला.
शतक पूर्ण झाल्यानंतर, ड्रेसिंग रूममधील त्याच्या सहकाऱ्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे अभिनंदन केले. कोहलीने हात जोडून वर पाहिले आणि या यशाबद्दल देवाचे आभार मानले. दुर्दैवाने, शतक ठोकल्यानंतर लगेचच तो बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
क्रिकेट इतिहासातील 'तो' अनोखा विक्रम
विराट कोहलीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलेला एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे, जो आजवर कोणत्याही खेळाडूला गाठता आला नव्हता: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५२ शतके (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मिळून) झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटीमध्ये ५१ शतके करण्याचा विक्रम होता. कोहलीने आधीच एकदिवसीय सामन्यांमध्ये ५१ शतके पूर्ण केली होती, आणि आज त्याने वनडेतील आपले ५२ वे शतक झळकावले. याशिवाय, हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८३ वे शतक आहे, ज्यामुळे तो महान फलंदाजांच्या यादीत आपले स्थान अधिक भक्कम करत आहे. विशेष म्हणजे, विराट कोहलीने केलेले हे शतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७००० वे शतक ठरले आहे.
रांचीचे मैदान ठरले लकी
विराट कोहलीला रांचीच्या मैदानावर खेळायला विशेष आवडते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्याने या मैदानावर खेळलेल्या फक्त पाच डावांमध्ये हे तिसरे शतक झळकावून इतिहास रचला आहे. यापूर्वी त्याने विशाखापट्टणम आणि पुणे येथील मैदानांवरही प्रत्येकी तीन शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने आपल्या दमदार खेळीने केवळ भारताला विजयाच्या दिशेने नेले नाही, तर त्याने आपल्या कारकिर्दीत आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.ल












Click it and Unblock the Notifications