T20 world cup: भारत उपांत्य फेरीतील दावेदारी मजबूत करणार, पावसामुळे सामन्यात अडथळा येणार?वाचा…
Mumbai: अफगाणिस्तानविरुद्ध सुपर एटमध्ये विजयी सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला शनिवारी बांगलादेशचे आव्हान असेल. उभय संघांमधील हा सामना अँटिग्वा येथे होणार आहे. या स्पर्धेत भारताची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत.
बांगलादेशविरुद्ध विजयाची नोंद करून संघ उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छितो. यापूर्वी भारताने बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळला होता आणि त्यात विजय मिळवला होता.

भारताची विजयी घौडदौड
भारताने आयर्लंडविरुद्धच्या T20 विश्वचषकात विजयी सुरुवात केली. सुरूवातीच्या सामन्यान संघाने सात गडी राखून विजय मिळवला. यानंतर संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला आणि नंतर सह-यजमान अमेरिकेला पराभूत केले.
यानंतर भारतीय संघ सुपर एटसाठी भारतीय संघ पात्र ठरला. भारताचा कॅनडाविरुद्धचा गृप स्टेजमधील सामना पावसामुळे रद्द झाला. नंतर संघाने अफगाणिस्तानविरुद्ध ४७ धावांनी विजय मिळवला.
भारतीय गोलंदाजांचा जोरदार फॉर्म
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजनंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर एट सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत लक्ष्याचा बचाव करताना प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्यात यश मिळवले.
अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या देखील बुमराहला चांगली साथ देत आहेत, तर अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषकात प्रथमच प्लेइंग-11 मध्ये सामील झालेला फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनेही प्रभावित केले.
बांगलादेशसाठी करा या मरो ही स्पर्धा
बांगलादेशला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर एट सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध प्रभावी कामगिरी करू शकला नाही तर त्यांच्यासाठी पुढील दरवाजे बंद होतील. बांगलादेशने ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंका, नेपाळ आणि नेदरलँड्सचा पराभव करून सुपर एटसाठी पात्रता मिळवली होती.
ग्रुप स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून केवळ चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-20 मध्ये खूप अटीतटीचे सामने झाले आहेत, त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे.
पावसाची शक्यता कमी
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान शनिवारी अँटिग्वामध्ये पावसाची शक्यता कमी आहे, ही भारतीय चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे. हवामान खात्यानुसार सामन्यादरम्यान पावसाची शक्यता 23 टक्के असून दिवसभर वातावरण आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत चाहत्यांना 40 षटकांचा संपूर्ण खेळ पाहायला मिळणार आहे. भारतीय संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरल्यास उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करेल.












Click it and Unblock the Notifications