IPL Auction 2025 :पहिल्या दिवशी लिलावानंतर कुणाकडे किती पैसे उरले? हैदराबादकडे सर्वात कमी उरले
IPL Auction 2025 : आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी संघांने बक्कळ पैसा खेळाडू खरेदी करण्यावर लावला आहे. कोट्यवधींची बोली लागल्याने आता पैशांची रक्कमही बरीच कमी झाली आहे. पहिल्या दिवशी झालेल्या लिलावावर नजर टाकली तर अंदाजे 468 कोटी रुपये खर्च झाले. आहेत.
ऋषभ पंत सर्वात मोठा महागडा खेळाडू म्हणून पुढे आला आहे. तो 27 कोटींसाठी लखनऊ सुपर जायंट्सकडे गेला आहे. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरच्या खात्यातही भरपूर पैसे आले आहेत. 26 कोटी 75 लाखांत तो पंजाब किंग्जमध्ये गेला. व्यंकटेश अय्यरला KKR ने 23 कोटी 75 लाखांना विकत घेतले, ही थोडी आश्चर्याची रक्कम आहे पण अनेक संघांसोबत लिलाव युद्धानंतर KKR ने त्याला विकत घेतले.

भारताच्या पहिल्या पाचमध्ये आणखी दोन नावे आहेत. त्यापैकी पहिले नाव अर्शदीप सिंगचे आहे. दुसरे नाव युजवेंद्र चहलचे आहे. दोघांनाही पंजाब किंग्जने प्रत्येकी 18 कोटी रुपयांना विकत घेतले. संघांना अजूनही भरपूर रिकाम्या जागा भरायच्या आहेत पण पैसे खूप तंग आहेत.
आता जर आपण पर्समध्ये शिल्लक राहिलेली रक्कम पाहिली तर RCB हा अव्वल संघ आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचे नाव येते. मुंबईतील अनेक जागा रिक्त आहेत. आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सकडेही अनेक जागा रिक्त आहेत. कुणाच्या पर्समध्ये किती रक्कम उरली हे आपण आता पाहुया.
(संघ) (शिल्लक रक्कम) (उपलब्ध स्लॉट) (झालेले स्लॉट) (घेतलेले खेळाडू)
- RCB : (30.65 कोटी) 16 5 6
- मुंबई इंडियन्स (26.170 कोटी) 16 7 4
- पंजाब किंग्स (22.50 कोटी) 13 6 10
- गुजरात टायटन्स (17.50 कोटी) 11 5 9
- राजस्थान रॉयल्स (17.35 कोटी) 14 4 9
- चेन्नई सुपर किंग्स (15.60 कोटी) 13 4 7
- लखनऊ सुपर जायंट्स (14.85 कोटी) 13 4 7
- दिल्ली कॅपिटल्स (13.80 कोटी) 12 4 9
- KKR (10.15 कोटी) 12 3 5
- हैदराबाद (5.15 कोटी) 12 4 8












Click it and Unblock the Notifications