एकाच दिवशी 2 हाय-व्होल्टेज मॅच! भारत-पाक क्रिकेट युद्धाचा दुर्मिळ योग; तारीख वेळ जाणून घ्या
India vs pakistan double header 15 february 2026 t20 world cup asia cup : भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. पण आगामी १५ फेब्रुवारी २०२६ हा दिवस क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. या एकाच दिवशी क्रिकेटप्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दोन मोठे सामने पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला महिलांची 'रायझिंग स्टार्स' आशिया कपची लढत होईल, तर दुसरीकडे पुरुषांच्या टी२० विश्वचषकाचा महामुकाबला रंगणार आहे.

डबल धमाका: कधी आणि कुठे होणार सामने?
१. विमेन्स राइजिंग स्टार्स आशिया कप (भारत-अ विरुद्ध पाकिस्तान-अ):
- वेळ: दुपारी १२:३० वाजता (भारतीय प्रमाणवेळ)
- ठिकाण: टेर्डथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक (थायलंड)
या सामन्याचे महत्त्व काय? : एशियन क्रिकेट कौन्सिलने (ACC) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बँकॉक येथे होणाऱ्या या स्पर्धेत दोन्ही देशांच्या युवा खेळाडूंची ताकद पाहायला मिळेल. १५ फेब्रुवारीला दुपारी या स्पर्धेतील सर्वात मोठा गट सामना खेळवला जाईल.
२. पुरुष टी२० वर्ल्ड कप २०२६ (भारत विरुद्ध पाकिस्तान):
- वेळ: संध्याकाळी ७:०० वाजता (टॉस ६:३० वाजता)
- ठिकाण: आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो (श्रीलंका)
- महत्त्व: हा दिवस खऱ्या अर्थाने गाजवेल तो संध्याकाळचा विश्वचषकातील सामना. कोलंबोच्या मैदानावर भारताचे वरिष्ठ खेळाडू पाकिस्तानला भिडतील. टी२० विश्वचषकातील हा ग्रुप 'A' मधील सर्वात महत्त्वाचा सामना असून जगभरातील करोडो चाहत्यांचे यावर लक्ष असेल.
वेळापत्रकाचे वैशिष्ट्य
१५ फेब्रुवारीला सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत क्रिकेटचा थरार सुरू राहणार आहे. बँकॉकच्या मैदानावर महिलांचा सामना संपल्यानंतर अवघ्या काही तासांत कोलंबोमध्ये पुरुषांच्या सामन्याचा थरार सुरू होईल. एकाच दिवशी दोन 'मदर ऑफ ऑल बॅटल्स' पाहण्याचा हा चाहत्यांसाठी दुर्मिळ योगायोग आहे.
भारतीय संघात झालेले ५ प्रमुख बदल
१. शुबमन गिलला डच्चू
सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलला टी२० संघातून वगळण्यात आले आहे. खराब फॉर्मचे कारण देत त्याला १५ जणांच्या संघात स्थान मिळालेले नाही.
२. इशान किशनचे पुनरागमन
बऱ्याच काळानंतर इशान किशनचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान मिळाले असून, तो सलामीलाही खेळू शकतो.
३. अभिषेक शर्माला संधी
सलामीवीर म्हणून अभिषेक शर्माला संघात स्थान देण्यात आले असून, त्याची आक्रमक फलंदाजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतासाठी 'एक्स फॅक्टर' ठरू शकते.
४. रिंकू सिंग आणि टिलक वर्मा
मधल्या फळीत 'फिनिशर' म्हणून रिंकू सिंगची वापसी झाली आहे, तर टिळक वर्मालाही त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे संघात कायम ठेवले आहे.
५. फिरकी विभागात बदल
फिरकीसाठी कुलदीप यादवसोबत वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांची निवड करण्यात आली असून, फिरकीला साथ देण्यासाठी अक्षर पटेल (उपकर्णधार) देखील संघात आहे.
टी२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि इशान किशन (यष्टीरक्षक).












Click it and Unblock the Notifications